Homeताज्या बातम्यादेऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते डॉ. गणेश मांटे होते.

सभेला नगरपरिषद उपाध्यक्षपती राजेश भुतडा, बांधकाम सभापती विष्णू झोरे, बालकल्याण सभापती पती विकास कासारे, गटनेते छोटूभाऊ वाघ यांच्यासह भगवान बाबा नगर, समता कॉलनी व स्वामी विवेकानंद नगर परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सभेत पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, नवीन नळकनेक्शन, विद्युत पोल उभारणी, नाल्यांचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्त्यांच्या दर्जेदार कामांबाबत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. विशेषतः पाणीपुरवठा किमान आठ दिवसांत नियमित करण्याची मागणी नागरिकांनी केली.

यावर संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत, भगवान बाबा नगर परिसराचे सुशोभीकरण तसेच नालंदा वाचनालय परिसराच्या विकासालाही प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.

नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक थेट नागरिकांच्या दारी जाऊन समस्या जाणून घेत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सर्व समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव नागरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धुमाळ सर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!