Homeताज्या बातम्याKasba Peth Vidhan Sabha : भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण...

Kasba Peth Vidhan Sabha : भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण मैदान मारणार?

पुणे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९ च्या पोटनिवडणुकीने याला छेद दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता.

आगामी निवडणुकीत काँग्रेस गेल्या विजयाची पुनरावृत्ती करणार की भाजप पुन्हा आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत दोन महिलांना आमदार म्हणून संधी मिळाली आहे.

कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. यापूर्वी २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट पाचवेळा आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविला होता. धंगेकर यांना ७३ हजार ३०९ मते, तर रासने यांना ६२ हजार २४५ मते मिळाली होती. धंगेकर यांनी रासने यांच्यावर १० हजार ९१५ मताधिक्य मिळविले होते.

कसबा मतदारसंघाची निर्मिती १९७२ मध्ये झाली होती. त्यात काँग्रेसच्या लीलाबा व्यापारी यांनी काँग्रेसकडून विजय मिळविला होता. त्यानंतर १९७८ मध्ये अरविंद लेले हे जेएनपीच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, त्यानंतर १९८० मध्ये अरविंद लेले यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून मतदारसंघावर झेंडा रोवला होता. १९८५ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे गेला. या निवडणुकीत उल्हास काळोखे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९० मध्ये कसबा पुन्हा भाजपकडे आला. त्यात भाजपच्याच अण्णा जोशी यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९५ पासून भाजपचे गिरीश बापट हे सलग पाचवेळा भाजपकडून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांना ७५,४९२ मते मिळाली होती. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना ४७,२९६ मते मिळाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...
error: Content is protected !!