Homeताज्या बातम्याहडपसर विधानसभा मतदार संघातून मुस्लिम समाजाने थोपटले दंड ; हडपसर मधुन महाविकास...

हडपसर विधानसभा मतदार संघातून मुस्लिम समाजाने थोपटले दंड ; हडपसर मधुन महाविकास आघाडीकडे हाजी रशिद शेख यांच्या उमेदवारीची मागणी…

महाविकास आघाडीने मुस्लिम व अल्पसंख्यांकांना 15 टक्के उमेदवारी जाहीर करण्याची मागणी…
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कडून मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाच्या घटकांना सत्तेतील भागीदारी देण्याच्या उद्देशाने 15 टक्के उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी अघ्यक्ष रशिद शेख यांनी आज पुणे येथे पुणे मुस्लिम कॉन्फ्रेंस या मुस्लिम समाजची बैठकी मध्ये जमियत उलमा पुणे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी, इंकिलाब सोशल मूवमेंट, सर्व मुस्लिम सामाजिक कार्यकर्ता व समक्ष मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत घेण्यात आली या कॉन्फरन्सचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक मुस्लिम समाजाचे मौलवी, धर्मगुरू व इतर मान्यवर होते.
                     👇👇 पहा व्हिडीओ 👇👇
👆👆 पहा व्हिडीओ 👆👆
मुस्लिम समाजाचे मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते यांची फक्त एकच घोषणा आहे की,
कब तक मुस्लिम सामाज सिर्फ वोट बन कर रहेंगा.
हमें सत्ता में हिस्सेदारी कब मिलेगी अगर हमें आप हिस्सेदारी नही देंगे तो हम महा विकास आघाडी का साथ इस विधान सभा चूनाव में नहीं देंगे
या मागणीवर आघाडीच्या सर्व नेत्यांनी लक्ष्य द्यावे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान वाचविणे व देशातील धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण संपवावे या उद्देशाने मुस्लिम व इतर अल्पसंख्यांक समुदायाने देशभरात इंडिया अलाईन्स व राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचा जोरदार पराभव केलेला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही अटी व शर्ती शिवाय मुस्लिम  समुदायाने केलेल्या मतदानाच्या अनुषंगाने तसेच योग्य प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निमित्ताने करावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आली आहे. पंधरा टक्के प्रतिनिधीत्वाच्या मागणीचे  निवेदन राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, तसेच  नानासाहेब पटोले यांना लिखित स्वरूपात पाठवण्यात आल्याची माहीती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली यावेळी  ” अल्पसंख्यांक समुदायाला या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करून नेमक्या किती जागा मिळणार आहेत ? याची आकडेवारी त्यांनी 22 ऑक्टोंबर पर्यंत जाहीर करणे अपेक्षित आहे.” असे देखिल डंबाळे यांनी सांगितले.
“पश्चिम महाराष्ट्रातून हडपसर मतदार संघ मुस्लिमांसाठी सुरक्षित असल्याने या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या उमेदवारीमुळे जवळपास पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात व पश्चिम महाराष्ट्रातील 84 मतदार संघात याचा सकारात्मक संदेश जाणार असल्याने महाविकास आघाडीने माझ्या उमेदवारी बाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा या पत्रकार परिषदेतुन रशिद शेख यांनी व्यक्त केली. दरम्यान निवडणुकीसाठीची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली असून या अनुषंगाने मतदारसंघात 20 पेक्षा अधिक बैठका घेऊन व्यापक सहमती मिळवण्यात आल्याचे ही रशिद शेख यांनी सांगितले.
योग्य प्रतिनिधीत्व न दिल्यास महाविकास आघाडीचा हक्काचा मतदार नाराज होऊन तो आपला असंतोष अन्य मार्गाने व्यक्त करण्याची शक्यता आहे. हरियाणा येथे भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय हा धक्कादायक स्वरूपाचा असून इंडिया अलायन्सच्या धरसोड वृत्तीमुळे अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष मतदारांच्या नाराजीचाच हा फटका आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे आम्हाला वाटते त्यामुळे महाविकास आघाडीने तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. अशी भुमिका मुस्लिम नेते जाहीद शेख यांनी मांडली.
हडपसर मधुन रशिद शेख यांच्या उमेदवारीची मागणी
हडपसर विधानसभा मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व अल्पसंख्यांक समाजाचे नेते रशीद शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन जमीयत ए उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती शाहीद  यांच्या नेतृत्वा खाली शिष्टमंडळाने केली आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा अशी भुमिका मुफ्ती शाहीद यांनी मांडली.
राज्यातील 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक स्वरूपात असून स्वबळावर 20 ते 22 जागांवर ते निवडून येण्याची खात्री आहे व तशी चाचणी देखील स्थानिक इच्छुक उमेदवाराकडून सुरू आहे. अशी माहीती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे सरचिटणीस लुकास केदारी यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!