Homeताज्या बातम्याकधी ऊन-वारा, तर कधी अवकाळीच्या धाराच्या आ; बदलत्या हवामानाचा शेती अन् नागरिकांरोग्याला...

कधी ऊन-वारा, तर कधी अवकाळीच्या धाराच्या आ; बदलत्या हवामानाचा शेती अन् नागरिकांरोग्याला धोका

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) :  हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, “दिवसा ऊन-वारा, कधी पावसाच्या धारा आणि रात्री थंडगार वारा” असे चित्र निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेती पिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दिवसभर कडक ऊन आणि वाऱ्याचा जोर जाणवत असताना, दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडगार वारा वाहत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके काढणीच्या टप्प्यावर असून, अचानक पडणाऱ्या पावसामुळे पिके ओलसर होऊन दाण्यांची गुणवत्ता घसरत आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे.

अवेळी पावसाचा फटका टरबूज, खरबूज आदी हंगामी पिकांसह आंबा, मोसंबी फळबागांनाही बसत आहे. फुलोरा आणि लहान फळे गळण्याचे प्रमाण वाढले असून, तापमानातील अचानक बदलामुळे रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. मानवी आरोग्यावरही या हवामानाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार वाढत आहेत.

डॉ. चंद्रशेखर गवळी गढी गेवराई
हवामानातील हे अनियमित बदल वातावरणीय असंतुलनाचे संकेत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आजारी रुग्णांनी स्वतःहून औषधी न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!