Homeमहाराष्ट्रजळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासनिक फेरबदल करण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातून उशिरा रात्री या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त झालेल्या सीईओ करिश्मा नायर यांच्यासमोर असणार आहे. मीनल कर्णवाल यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वेग कायम ठेवत त्यात अधिक गती देण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा तरुण, तडफदार आणि उच्चशिक्षित अधिकारी लाभल्याने समाधान व्यक्त होत आहे.

करिश्मा नायर यांचा परिचय
करिश्मा नायर या २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस्सी. पदवी संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच २ एप्रिल २०२५ पासून त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

मीनल कर्णवाल यांची कारकीर्द उल्लेखनीय
गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात मीनल कर्णवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेमार्फत अनेक लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवले. विशेषतः ग्रामीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेले निर्णय आणि प्रशासनिक शिस्त यामुळे त्यांची कारकीर्द जिल्ह्यात गाजली. त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नवीन सीईओ करिश्मा नायर यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....
error: Content is protected !!