जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार ) : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५ वर्षे) असे आहे. काही दिवसांपूर्वी नितीन काळे यांनी संशयित तूकाराम सूर्यवंशी याला जेवणासाठी पैसे उधार दिले होते. त्यानंतर सूर्यवंशी यांनी नितीनकडे ५०० रुपये मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात संशयिताने धारदार शस्त्राने नितीन काळे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले होते. जखम इतकी गंभीर होती की त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी तूकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नितीन काळे यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५ वर्षे) असे आहे. काही दिवसांपूर्वी नितीन काळे यांनी संशयित तूकाराम सूर्यवंशी याला जेवणासाठी पैसे उधार दिले होते. त्यानंतर सूर्यवंशी यांनी नितीनकडे ५०० रुपये मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात संशयिताने धारदार शस्त्राने नितीन काळे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले होते. जखम इतकी गंभीर होती की त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी तूकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नितीन काळे यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.






















