Homeक्राईमएक लाखांची लाच घेताना शनी पेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी रंगेहात अटकेत

एक लाखांची लाच घेताना शनी पेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी रंगेहात अटकेत

 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव शहरातील शनी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पितांबर अहिरे (वय ४०, रा. पोलीस लाईन, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून ते सध्या जळगाव शहरातील शनी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

तक्रारदार हा जळगाव येथील रहिवासी असून, त्याच्या मुलाविरोधात शनी पेठ पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडे सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती.

मात्र, नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन ही रक्कम एक लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी रचलेल्या सापळ्यात संशयित विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
या धडक कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!