Times Of Maharashtra Desk:कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी एसटी बस (क्र. MH14 LX 6747) पुलाच्या कठडयाला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील १४ शालेय विद्यार्थी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही पिंपरी शहाली ता. नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेची सहल घेऊन निघाली होती दि. १२ रोजी पहाटेच्या सुमारास बस घेऊन जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने अचानक रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.ही बस लेण्याद्री कडे जात असताना डुंबरेवाडी जवळील लहान पुलाच्या कठडयाला धडकून पलटी झाली. बसमध्ये विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी मिळून ५३ जन होते. या घटनेत १४ विद्यार्थी,४ शिक्षक जखमी झाले आहेत.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून प्राथमिक मदत केली. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे. बसचा वेग, यांत्रिक बिघाड किंवा रस्त्याची परिस्थिती याबाबतही चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.






















