Homeताज्या बातम्याखडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास आपचा कॅन्टोन्मेंट बोर्डाला आंदोलनाचा इशारा...

खडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास आपचा कॅन्टोन्मेंट बोर्डाला आंदोलनाचा इशारा…

खडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास  आपचा कॅन्टोन्मेंट बोर्डाला आंदोलनाचा इशारा…

 
पुणे :- खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील होळकर ब्रिज चौक, तसेच मुळा रोड, भैय्यावाडी चौक  ते खडकी बाजार रोड या सर्वच गर्दीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून गेल्या दोन महिन्यापासून आम आदमी पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते या संदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत. अनेक स्थानिक नागरिकांनी सुद्धा याबाबत तक्रार दिलेली होती. परंतु कॅन्टोन्मेंट प्रशासन या संदर्भात ढीम्म असल्यामुळे काल शुक्रवार रोजी आम आदमी पार्टीने सदरच्या जागेवरून दुपारी सोशल मीडियावर खड्डे व वाहतूक कोंडीचे व्हिडिओ लाईव्ह केले तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहन चालकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
खडकी कॅन्टोन्मेंट येथे गेले अनेक वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळे त्याला कोणी वाली उरलेला नाही. तसेच प्रशासनही यासंदर्भामध्ये काहीही कार्यवाही करत नाही. मुख्य म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इमारतीजवळच्या चौकातच मोठे खड्डे असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकातून खडकी प्रशासनाचे अधिकारी रोज येजा करतात तरीसुद्धा ते खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. स्थानिक आमदार शिरोळे मात्र त्या चौकातही बॅनरबाजी करीत आहेत असा रोष आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला. 
या संदर्भात तातडीने खड्डे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आले असून यावेळेस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांचे सोबत पदाधिकारी मनोज एरांडकर ,अजय पारचा, विकास चव्हाण, अमोल मोरे, संजय कटारनवरे, तहसीन शेख आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!