Homeमनोरंजनअहिरभैरव‌’, ‌‘ललत‌’, ‌‘परमेश्वरी‌’, ‌बिलासखानी ‘सारंग‌’चे सुमधुर सादरीकरण

अहिरभैरव‌’, ‌‘ललत‌’, ‌‘परमेश्वरी‌’, ‌बिलासखानी ‘सारंग‌’चे सुमधुर सादरीकरण

पुणे : सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांच्या शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित प्रात:कालीन रागांच्या मैफलीत अहिरभैरव, ललत, परमेश्वरी, बिलासखानी तोडी आणि सारंग यांचे सुमधुर सादरीकरण झाले.

वारजे येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या सभागृहात रविवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

दुबई येथील संगीतप्रेमी रसिक श्रीरंग कुलकर्णी यांच्या वतीने कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराने युवा तबलावादक प्रणव मिलिंद गुरव यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मानपत्र, अकरा हजार रुपये रोख, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मैफलीची सुरुवात अनुराधा लेले यांनी राग अहिरभैरवमधील ‌‘हे लाल अलसाने’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत लयीत पं. हेमंत पेंडसे रचित ‌‘करम तुही करतार तु‌’ ही बंदिश सादर करून ‌‘मान रे मोरा मनवा तुम‌’ ही रचना सादर केली. संदिप देशमुख यांनी राग ललतमधील ‌‘रैन का सपना‌’ ही पारंपरिक रचना आपल्या मधूर आवाजात सादर केली तर ‌‘मारी घुंगरवा खेलनवा‌’ ही दृत लयीत सादर केलेली रचना रसिकांना विशेष भावली. पंडित अभिषेकीबुवा यांनी गायलेली राग परमेश्वरीमधील ‌‘मातेश्वरी परमेश्वरी‌’ ही बंदिश राधिका ताम्हनकर यांनी प्रभावीपणे सादर करून त्याला जोडून पंडित हेमंत पेंडसे यांनी रचलेला ‌‘दिर दिर तानुम्‌‍ त देरे ना‌’ हा तराणा सादर केला.

विशेष निमंत्रित गायक पंडित सचिन नेवपूकर (संभाजीनगर) यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग बिलासखानी तोडीतील ‌‘श्री कामेश्वरी‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. दृत लयीत ‌‘जा जारे जा जा रे’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. त्यानंतर सारंग रागातील ‌‘तुम रब तुम साहिब‌’ ही पारंपरिक तसेच ‌‘गगरी फोडी मोरी कान्हाने‌’ ही स्वरचित रचना सादर केली.

कार्यक्रमाची सांगता पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या ‌‘सब सखिया समझाए‌’ या भैरवीने झाली. कलाकारांना अभिजित बारटक्के (तबला), आदिती गराडे (संवादिनी), रोहन देशपांडे, श्रावणी कुलकर्णी, यश कोल्हापुरे, संदिप देशमुख (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!