Homeताज्या बातम्याबेलेश्वर संस्थानात भक्तिरंगाची उधळण: ईश्वरबाबा भारती जन्मोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी

बेलेश्वर संस्थानात भक्तिरंगाची उधळण: ईश्वरबाबा भारती जन्मोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):
गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थानात महान सिद्ध साधू श्री गुरु ईश्वर भारती महाराज यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त ५२ वा जन्मोत्सव सोहळा आणि दोन दिवसीय कीर्तन महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

महोत्सवाची सुरुवात शनिवार, २ मे रोजी कलश पूजनाने झाली. पहिल्या दिवशी ह.भ.प. प्रा. त्र्यंबक महाराज मातकर (वरवटी) यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र मस्के व भाजपा युवा नेते शरद बडगे यांची उपस्थिती लाभली.

रविवार, ३ मे रोजी कीर्तनकेसरी ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ रंगले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून सादर केलेल्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत महादेव भारती महाराज आणि ह.भ.प. शांतिब्रह्म तुकाराम भारती महाराज यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विनोद मनोहर शेळके, गणेश मनोहर शेळके व समस्त शेळके पाटील परिवाराने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते.

बेलगाव, वाघीरा, पोखरी, बेलखंडी, देवाच्यावाडी, पिंपरनई, सोमनाथवाडी, मुळूक, लिंबागणेश आदी गावांमधून महिला-पुरुष भाविक, वारकरी, भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते व मार्गदर्शक मंडळींच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...
error: Content is protected !!