Homeताज्या बातम्याबेलेश्वर संस्थानात भक्तिरंगाची उधळण: ईश्वरबाबा भारती जन्मोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी

बेलेश्वर संस्थानात भक्तिरंगाची उधळण: ईश्वरबाबा भारती जन्मोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):
गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थानात महान सिद्ध साधू श्री गुरु ईश्वर भारती महाराज यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त ५२ वा जन्मोत्सव सोहळा आणि दोन दिवसीय कीर्तन महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

महोत्सवाची सुरुवात शनिवार, २ मे रोजी कलश पूजनाने झाली. पहिल्या दिवशी ह.भ.प. प्रा. त्र्यंबक महाराज मातकर (वरवटी) यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र मस्के व भाजपा युवा नेते शरद बडगे यांची उपस्थिती लाभली.

रविवार, ३ मे रोजी कीर्तनकेसरी ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ रंगले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून सादर केलेल्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत महादेव भारती महाराज आणि ह.भ.प. शांतिब्रह्म तुकाराम भारती महाराज यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विनोद मनोहर शेळके, गणेश मनोहर शेळके व समस्त शेळके पाटील परिवाराने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते.

बेलगाव, वाघीरा, पोखरी, बेलखंडी, देवाच्यावाडी, पिंपरनई, सोमनाथवाडी, मुळूक, लिंबागणेश आदी गावांमधून महिला-पुरुष भाविक, वारकरी, भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते व मार्गदर्शक मंडळींच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...
error: Content is protected !!