Homeक्राईमनसरापूर घटनेच्या निषेधार्थ जळगावात निवेदन; आरोपींना फाशीची मागणी

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ जळगावात निवेदन; आरोपींना फाशीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हिंदू संघटन, जळगाव यांच्या वतीने दिनांक ४ मे रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकाल द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नसरापूर येथील ही घटना अत्यंत निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. अशा नराधमांना रोखण्यासाठी शासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत. शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींना १५ ते २१ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ, उपजिल्हाध्यक्ष नागराज महाजन, योगेश बाविस्कर, महासचिव रत्ना अंतर्डे, युवा अध्यक्ष ओम प्रकाश जोशी, उपाध्यक्ष सुनील राजपूत, राजेश बंसल, महिला पदाधिकारी कुमारी मनीषा हटकर, युवा महासचिव निलेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विजय पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर घटनेमुळे राज्यात निर्माण झालेल्या भीती आणि संतापाच्या वातावरणात पीडितेला न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...
error: Content is protected !!