Homeक्राईमचापडगाव सबस्टेशन चोरी प्रकरण उघड: तांत्रिक तपासातून ३ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल...

चापडगाव सबस्टेशन चोरी प्रकरण उघड: तांत्रिक तपासातून ३ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेवगाव (प्रतिनिधी जयप्रकाश बागडे) :  तालुक्यातील चापडगाव येथे वीज मंडळाच्या सबस्टेशनमध्ये झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

२२ एप्रिलच्या मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी वॉचमन गोकुळ संपत मडके (रा. गदेवाडी) यांच्यावर लाकडी दांडके व गजाने हल्ला करून गंभीर मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची मोडतोड करत त्यातील सुमारे ९९० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि ५३० किलो कॉपर कॉइल असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी भीमा लक्ष्मण म्हस्के, अविनाश कल्याण धुरंधरे आणि अमोल गणेश रांजवन (सर्व रा. बीड) हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीत वापरलेली शिफ्ट कारसह एकूण ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव पोलीस ठाण्याकडून सुरू असून, फरार असलेल्या इतर आरोपींचा शोधही घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...
error: Content is protected !!