Homeताज्या बातम्यापुण्यातील ऑर्किड्स शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के, मुलींनी मारली बाजी...

पुण्यातील ऑर्किड्स शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के, मुलींनी मारली बाजी…

पुण्यातील ऑर्किड्स शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के, मुलींनी मारली बाजी…
 
पुणे – भवानी पेठ येथील ऑर्किड्स स्कूलने यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागवून गौरवाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे या यशात मुलींनी आघाडी घेतली असून, शाळेच्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे.
शाळेतील पहिल्या क्रमांकावर आयेशा अब्दुल लतीफ कारीगर ही विद्यार्थीनी 93.80% गुण मिळवून चमकली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयेशा असदुल्लाह खान हिने 93.60% गुण मिळवले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर अनस इरफान शेख याने 92.00% गुणांसह स्थान पटकावले आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन 100% निकालाची उज्वल कामगिरी साधली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. यशस्वी निकालासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य याचे फलित आहे.
या यशानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका हिना शेख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अत्यंत समर्पणाने अभ्यास करून हे यश मिळवले आहे. यामध्ये शिक्षकांनी वेळोवेळी घेतलेल्या मार्गदर्शन वर्गांनी आणि वैयक्तिक लक्ष देण्याच्या पद्धतीने फार मोठा वाटा उचललेला आहे.”
पालक आणि विद्यार्थी दोघेही या यशामुळे अत्यंत समाधानी असून, पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ऑर्किड्स शाळेचा हा निकाल भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शाळेचे 100% निकालाबाबत शाहीदा नासिर खान यांची प्रतिक्रिया…
न्यू महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे  सचिव शाहीदा नासिर खान यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, “या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये केवळ त्यांच्या परिश्रमांचा नव्हे, तर संपूर्ण शिक्षकवर्गाच्या समर्पित प्रयत्नांचा वाटा आहे. विशेषतः गणितासारख्या विषयात मी स्वतः वैयक्तिक लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आले आहे. कोणत्याही वेळेस विद्यार्थ्यांना शंका असल्यास आम्ही त्यांच्या सहाय्यासाठी तत्पर राहिलो.”
“शिक्षण हे फक्त पुस्तकापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. मुलांनीही खूप मेहनत घेतली आणि वेळेचे उत्तम नियोजन करून अभ्यास केला, त्यामुळेच आज आम्ही हा गौरवशाली 100% निकाल पाहत आहोत,” असेही खान यांनी नमूद केले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गणित आणि इतर विषयावरील भीतीचे रूपांतर आत्मविश्वासात झाले, अशी माहिती शाळेतील इतर शिक्षकांनीही दिली. खान यांचे सातत्य आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली तत्परता ही यशामागील एक महत्त्वाची कारणीभूत ठरली आहे. तसेच संस्थेचे ट्रस्टी अस्मा ताहेरभोय आणि ओलिंडा परेरा यांचेही परिश्रम निकालात महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच या शाळेला विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...
error: Content is protected !!