Homeताज्या बातम्यामोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली...

मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी ?

मुंबई :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

रिक्त असलेल्या १२ जागांपैकी सात जागांसाठी महायुती सरकारने नावे निश्चित केली असून यामध्ये भाजपकडून तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन जागांसाठीच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.

भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचे ठरवल्याची माहिती आहे.

राज्यपाल नियुक्त जागांचा गुंता…

महाराष्ट्र विधानपरिषेदतील राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या जागांची नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. या १२ जागांमध्ये भाजपला सहा, शिंदेंच्या शिवसेनेला तीन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन जागा, असा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची चर्चा होती. या १२ पैकी आता महायुती सरकारने सात जागांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...
error: Content is protected !!