Times of Maharastra Desk , Phaltan Woman Doctor Suicide case : सतारा जिल्ह्यातील फलटण मधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेला नुकतेच दोन दिवस झाले असून या घटनेने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह अनेक राजकीय नेते मंडलिनी प्रतिक्रिया व्यक्त करत आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरवात केली आहे. फलटण मधील महिला डॉकटर आत्महत्या प्रकरण सांस्कृतिक समाजाच्या विवेकला हादरवून टाकणारं आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी संपदा मुंडे स्वतःवर होणाऱ्या आत्याचाराला कंटाळून भ्रष्ट आणि गुन्हेगारी व्यवस्थेची बळी पडली अशी संतापजनक प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त करत व्यवस्थेवर टीका केली आहे.
आत्महतेपूर्वी संपदा मुंडे हिने तिच्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत अहवाल चुकीचा देण्यासाठी पोलिस निरीक्षक आणि खाजदारांच्या दोन सचिवांनी दबाव टाकला असा आरोप आहे. यावर भाष्य करताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानावे यांनी मढयाचे माजी खासदार रंजीत निंबाळकर यांचे भाऊ अभिजीत निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांच्या वर टीका करत एक्स आपवर पोस्ट केली आहे.https://x.com/iambadasdanve/status/1982306041703563311?t=HedG8ZCXkqaskhMyvpKabw&s=08 या पोस्ट वर मृत तरुणीने पत्रात सताऱ्यातील खासदार असा उल्लेख केला आहे . आणि या प्रकरणाशी निंबाळकरांचा संबंध आहे अशी त्यांनी टीका केली आहे. या आरोपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी सताऱ्यातील एका कार्यक्रमात भाष्य करत म्हणाले “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण नसताना निंबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्यात येत आहे. या महाराष्ट्राला देवा भाऊ माहीत आहे, मला थोडी जारी शंका असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला असता .
याच टीकेवर रंजीत निंबाळकरानी देखील भाष्य करत उत्तर दिले की ” मला सुद्धा दोन मुली आहेत . आशा घाणेरड्या प्रकरणाशी जेव्हा नाव जोडले जाते तेव्हा वेदना होतात. हा आरोप फक्त मुख्यमंत्री साहेब या कऱ्यक्रमाल येऊ नये म्हणून केला गेला होता .
राजकीय पटलावर असे आरोप प्रत्यारोप होत असतानाच कॉँग्रेसच्या खासदार प्रणीत शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करत तुमच्या मुलीला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे . परंतु राजकीय प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे






















