स्थानिक रहिवासी श्री जयेश संजय घुगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग तसेच वन विभागाकडे तक्रार दाखल केली असून, सदर प्रकरण ग्रामपंचायत अंतापुर व संबंधित वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
भाविकांनी व्यक्त केलेल्या चिंता मुळं एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की, दावल मलिक बाबा हे केवळ श्रद्धास्थान नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. पण रस्त्याअभावी आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे हे ठिकाण दुर्लक्षित राहिले आहे.
श्री घुगे यांनी सांगितले की, “या गडावर दर गुरुवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भक्त येतात. मात्र रस्त्याचा अभाव, संरक्षण भिंतीचा अभाव यामुळे अपघाताची शक्यता नेहमीच असते. आपण शासन दरबारी एक हिंदू भाविक व सामाजिक बांधिलकी म्हणून ही मागणी करत आहोत की रस्त्याची पाहणी करून त्वरित उपाययोजना करावी.”
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग पासून दर्ग्यापर्यंतचा मार्ग, चढाईचा व उतरण्याचा स्वतंत्र व सुरक्षित रस्ता, तसेच संरक्षण भिंती यांची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाविकांची श्रद्धा आणि सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने त्वरित लक्ष घालून या पवित्र स्थळाचा विकास करावा, अशी कळकळीची मागणी करण्यात येत आहे.























