Homeताज्या बातम्यादावल मलिक बाबा दर्गा रस्त्याची दुर्दशा - भाविकांना जीव धोक्यात घालून...

दावल मलिक बाबा दर्गा रस्त्याची दुर्दशा – भाविकांना जीव धोक्यात घालून करावी लागते यात्रा…

अंतापुर, ता. अंबड, जि. जालना – श्री क्षेत्र दावल मलिक बाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठिकाण असून दर गुरुवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र या पवित्र गडावर जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून भाविकांना जीव मुठीत घेऊन डोंगर चढावा लागतो. या ठिकाणी कुठलाही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलं, महिलावर्ग व वृद्धांना दर्शनासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

स्थानिक रहिवासी श्री जयेश संजय घुगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग तसेच वन विभागाकडे तक्रार दाखल केली असून, सदर प्रकरण ग्रामपंचायत अंतापुर व संबंधित वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

भाविकांनी व्यक्त केलेल्या चिंता मुळं एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की, दावल मलिक बाबा हे केवळ श्रद्धास्थान नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. पण रस्त्याअभावी आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे हे ठिकाण दुर्लक्षित राहिले आहे.

श्री घुगे यांनी सांगितले की, “या गडावर दर गुरुवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भक्त येतात. मात्र रस्त्याचा अभाव, संरक्षण भिंतीचा अभाव यामुळे अपघाताची शक्यता नेहमीच असते. आपण शासन दरबारी एक हिंदू भाविक व सामाजिक बांधिलकी म्हणून ही मागणी करत आहोत की रस्त्याची पाहणी करून त्वरित उपाययोजना करावी.”

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image above👆👆

 

तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग पासून दर्ग्यापर्यंतचा मार्ग, चढाईचा व उतरण्याचा स्वतंत्र व सुरक्षित रस्ता, तसेच संरक्षण भिंती यांची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाविकांची श्रद्धा आणि सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने त्वरित लक्ष घालून या पवित्र स्थळाचा विकास करावा, अशी कळकळीची मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...
error: Content is protected !!