Homeताज्या बातम्यापुणे विमानतळावर महापौरांनाच ‘नो एन्ट्री’ - प्रशासनाचा बोजवारा, जबाबदार कोण? प्रभारी जनसंपर्क...

पुणे विमानतळावर महापौरांनाच ‘नो एन्ट्री’ – प्रशासनाचा बोजवारा, जबाबदार कोण? प्रभारी जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रेंवर कधी कारवाई होणार?

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- शहराच्या प्रथम नागरिकांनाच विमानतळावर ‘नो एन्ट्री’ मिळावी, ही केवळ धक्कादायकच नव्हे तर पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना ठरली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांना विमानतळ प्रवेश पास नसल्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर जाता आलं नाही. परिणामी, शहराच्या सन्मानालाच धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

सामान्यतः कोणताही मंत्री शहरात आल्यावर महापौर स्वतः उपस्थित राहून स्वागत करतात. मात्र, या वेळी केवळ एका ‘पास’च्या निष्काळजीपणामुळे महापौरांना बाहेरच थांबावं लागलं. हा प्रकार केवळ प्रशासनिक चूक नसून महापौर पदाचा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

महापौर कार्यालयाकडून प्रभारी जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांना वेळेत पास काढण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात अपयश आलं. प्रश्न असा की – ही केवळ हलगर्जीपणा की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

दरम्यान, महापौरांनी संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कधी होणार? की हा विषयही फक्त चर्चेतच राहणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

यामागे आणखी एक गंभीर प्रशासकीय गोंधळ समोर आला आहे. नगरसचिव योगिता भोसले यांची बदली झाल्यानंतर राजशिष्टाचार अधिकारी पद रिक्त आहे आणि त्याचा प्रभारी चार्जही कोणाकडे नाही. त्यामुळे विमानतळ पास काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

एकीकडे शहराचा सन्मान, तर दुसरीकडे प्रशासनाचा निष्क्रियपणा — या दोन्हींच्या कचाट्यात पुणेकरांची प्रतिमा चिरडली जात आहे.

👉 महापौरांचा अपमान झाल्यानंतरही जबाबदारांवर कारवाई होणार का?
👉 की पुन्हा एकदा ‘फाईल’मध्येच सगळं दडपलं जाणार?

पुणेकर आता उत्तरांची वाट पाहत आहेत…

भाग 2 मध्ये योगेश हेंद्रेंबाबत मोठी माहिती आणणार समोर…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!