पंतप्रधान मोदींना G-7 शिखर परिषदेसाठी निमंत्रण नाही; भारत-कॅनडा संबंधांतील तणावाचे संकेत…

पंतप्रधान मोदींना G-7 शिखर परिषदेसाठी निमंत्रण नाही; भारत-कॅनडा संबंधांतील तणावाचे संकेत…
कॅनडा: कॅनडामध्ये १५ ते १७ जून दरम्यान होणाऱ्या G-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. गेल्या सहा वर्षांत प्रथमच भारताचा प्रमुख या परिषदेला हजर राहणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे पाऊल भारत-कॅनडा संबंधांतील तणावाचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

 

G-7 परिषदेचे यजमानपद असलेल्या देशाला सदस्येतर देशांना निमंत्रित करण्याचा अधिकार असतो. यंदा कॅनडाने ऑस्ट्रेलिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील यांना निमंत्रित केले आहे, मात्र भारताला अद्याप निमंत्रण दिलेले नाही. भारत आणि कॅनडामधील संबंध २०२३ मध्ये कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारतीय एजंटांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर तणावपूर्ण झाले होते; भारताने हे आरोप फेटाळले होते.

दोन्ही देशांनी आपल्या राजनैतिक उपस्थितीत कपात केली असून, द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीमुळे जागतिक राजकारणात भारताच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement by Unique Computers

 

👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image above👆👆