Homeताज्या बातम्याProfessor Recruitment : प्राध्यापक भरतीत ७५:२५ सूत्र नको; अभाविप, राज्य सरकार आमने-...

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीत ७५:२५ सूत्र नको; अभाविप, राज्य सरकार आमने- सामने

Times of Maharashtra Desk, Pune : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये रखडलेल्या प्राध्यापक भरतीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्राध्यापक भरती पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असला तरी, यातील एका मुद्द्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अभाविपने सहायक प्राध्यापक भरतीसाठी शासनाने ठेवलेले ७५:२५ चे सूत्र त्वरित रद्द करून विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र अवलंबावे अशी मागणी केली आहे.

अभाविपचा आक्षेप

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, सहायक प्राध्यापक पदासाठी निवड होण्यासाठी ७५:२५ हे सूत्र ठेवण्यात आले आहे. या ७५ गुणांमध्ये शैक्षणिक पात्रता, शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य यांचा समावेश आहे. यात ७५ पैकी किमान ५० गुण मिळाले तरच ती व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. या निर्णयानुसार केवळ सेट/नेट उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्याचे गुण मिळणे शक्य नाही. या अटींमुळे सेट/नेट किंवा पीएचडी झालेले आणि विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेले बहुसंख्य उमेदवार ५० गुणांची अट पूर्ण करू शकणार नाहीत. हा निर्णय नवीन सेट/नेट उत्तीर्ण झालेल्या किंवा पीएचडी झालेल्या उमेदवारांवर अन्याय करणारा असून, सहायक प्राध्यापक पदासाठीचे ५०:५० हेच नैसर्गिक सूत्र वापरावे असे अभाविपचे म्हणणे आहे.

अभाविपच्या प्रमुख मागण्या

सहायक प्राध्यापक भरतीसाठी ७५:२५ चे सूत्र न अवलंबता युजीसीने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र त्वरित लागू करावे. शैक्षणिक पात्रतेतील दुजाभाव करणारी मानांकन पद्धती बदलण्यात यावी. सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या भरतीसाठी ७५:२५ सूत्र योग्य असले तरी, सहायक प्राध्यापक पदाच्या संदर्भातील या अटीवर योग्य पुनर्विचार करून निर्णयात बदल करण्यात यावा. या अभाविपच्या प्रमुख मागण्या आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अथर्व कुलकर्णी यांनी शासनाने यावर योग्य निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री करावी आणि केवळ या मुद्द्यावर भरती प्रक्रिया रखडणार नाही याची दक्षता घ्यावी असे मत व्यक्त केले आहे. अभाविपची मुख्य भूमिका प्राध्यापक भरतीची कार्यवाही आणि अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी हीच असल्याची देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

#MaharashtraNews #HigherEducation #ProfessorRecruitment #AssistantProfessor #UGCGuidelines #ABVP #ABVPMaharashtra #EducationPolicy #AcademicJobs #TransparentRecruitment #PuneUpdates #TimesOfMaharashtra #StudentsVoice #GovernmentDecision #75vs50Formula #ABVPDemands #MaharashtraUniversities

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...
error: Content is protected !!