Homeताज्या बातम्यापुण्यातील सायबर पोलिसांची मोठी कारवाई: ६.२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एक आरोपी अटकेत...

पुण्यातील सायबर पोलिसांची मोठी कारवाई: ६.२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एक आरोपी अटकेत…

पुणे शहरातील सायबर गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने ६ कोटी २९ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पनवेल येथून एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असून त्याने त्याच्या वडिलांसोबत संगणमत करून एका जेष्ठ नागरिकाला ‘डिजीटल अरेस्ट’च्या नावाखाली विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली होती.

 

ही घटना ९ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडली. अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून फिर्यादीला फोन करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असल्याचे सांगण्यात आले. चौकशीच्या नावाखाली त्यांना सातत्याने धमकावून, भीती दाखवून, पैसे वेगवेगळ्या खात्यांत पाठवण्यास भाग पाडण्यात आले. एकूण ६.२९ कोटी रुपये आरोपीच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

पोलिस तपासात समोर आले की, फसवणुकीनंतर आरोपीने एचडीएफसी बँकेतून संबंधित रकमेपैकी काही भागावर फिक्स डिपॉझिट केली होती. बँक खाते ‘श्री धावीर कन्स्ट्रक्शन’च्या नावावर असून, आरोपी बांधकाम व्यवसायिक आहे.

पोलिसांनी कोकबन (ता. रोहा, जि. रायगड) येथे शोधमोहीम राबवून तपास सुरू ठेवला. आरोपीस आपल्या मागे पोलीस लागल्याचे समजल्याने तो पळून गेला होता. मात्र, गुप्त बातमीदारामार्फत तुषार वाजंत्री हा पनवेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी पावसात प्रवास करून मोर्वे गावातील ऐश्वर्या रिसॉर्ट परिसरातून आरोपीस अटक करण्यात यशस्वी झाले.

 

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆

 

तुषार वाजंत्री याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. तपासात आरोपींच्या विरोधात देशभरात नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर पाच तक्रारी नोंद असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील हरिश्चंद्र वाजंत्री सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार सो, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख आणि उपआयुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!