Homeमहाराष्ट्रपरोपकाराच्या कार्याची दखल : मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान.

परोपकाराच्या कार्याची दखल : मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान.

पुणे (मुज्जम्मील शेख) : समाजसेवा आणि परोपकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लष्कर परिसरातील समाजसेवक मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील Louisiana Research University कडून ‘डॉक्टरेट इन सोशल वर्क अँड फिलॅन्थ्रॉपी’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या ऑनरिस नॉमिनेशन अॅडव्हायझरी कमिटीच्या शिफारशीनुसार तसेच सिनेट आणि कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनंतर विरदी यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला. गेल्या २७ वर्षांपासून कॅन्सरग्रस्त, निराधार, पीडित आणि विविध व्याधींनी त्रस्त नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.

विरदी यांना आजपर्यंत ३०० हुन अधिक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.

विरदी ह्यांची संस्था कोणत्याही देणगी घेऊन काम करत नाहीत तर ते स्व खर्चाने हे सर्व सामाजिक काम करत आहेत.

याबाबत बोलताना मनजितसिंग विरदी म्हणाले, “महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. या भूमीने आम्हाला सर्व काही दिलं आहे. त्यामुळे समाजासाठी काहीतरी परत देणं हीच खरी उतराई आहे.” कॅन्सरग्रस्त आणि निराधारांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्यातच जीवनाचा खरा अर्थ सापडतो, असेही त्यांनी सांगितले.

त्यांच्या सामाजिक कार्यामागील प्रेरणा कुटुंबाकडून मिळाल्याचे सांगताना विरदी म्हणाले, “माझे आजोबा, आई आणि आजी यांनी नेहमीच समाजासाठी काम करण्याचे संस्कार दिले. महाराष्ट्राने आपल्याला घडवलं आहे, त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे, हे त्यांनी शिकवलं.”

फाउंडेशनच्या नावाबाबत सुरुवातीला मनात संभ्रम होता. मात्र, “लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय करतोस हे महत्त्वाचं,” असा आईने दिलेला सल्ला आयुष्याला दिशा देणारा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

कॅन्सरग्रस्त मुलांसोबतचे अनुभव सांगताना विरदी भावूक झाले. “त्या मुलांना चित्रपट दाखवण्यासाठी नेणे, त्यांना खाऊ देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे, यातच आयुष्याचं खरं समाधान आहे. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहिला की मी स्वतःला सर्वात श्रीमंत माणूस समजतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. “तुम्ही खरे हिरो आहात,” असे धर्मेंद्र यांनी म्हटलेले शब्द आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

“आनंद देणं हेच खरं जीवन आहे. समाजासाठी काहीतरी केल्याशिवाय खरे समाधान मिळत नाही,” असा संदेश देत विरदी यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारांची परतफेड गरजू आणि निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!