Homeमहाराष्ट्रपरोपकाराच्या कार्याची दखल : मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान.

परोपकाराच्या कार्याची दखल : मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान.

पुणे (मुज्जम्मील शेख) : समाजसेवा आणि परोपकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लष्कर परिसरातील समाजसेवक मनजितसिंग विरदी यांना अमेरिकेतील Louisiana Research University कडून ‘डॉक्टरेट इन सोशल वर्क अँड फिलॅन्थ्रॉपी’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या ऑनरिस नॉमिनेशन अॅडव्हायझरी कमिटीच्या शिफारशीनुसार तसेच सिनेट आणि कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनंतर विरदी यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला. गेल्या २७ वर्षांपासून कॅन्सरग्रस्त, निराधार, पीडित आणि विविध व्याधींनी त्रस्त नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.

विरदी यांना आजपर्यंत ३०० हुन अधिक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.

विरदी ह्यांची संस्था कोणत्याही देणगी घेऊन काम करत नाहीत तर ते स्व खर्चाने हे सर्व सामाजिक काम करत आहेत.

याबाबत बोलताना मनजितसिंग विरदी म्हणाले, “महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. या भूमीने आम्हाला सर्व काही दिलं आहे. त्यामुळे समाजासाठी काहीतरी परत देणं हीच खरी उतराई आहे.” कॅन्सरग्रस्त आणि निराधारांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्यातच जीवनाचा खरा अर्थ सापडतो, असेही त्यांनी सांगितले.

त्यांच्या सामाजिक कार्यामागील प्रेरणा कुटुंबाकडून मिळाल्याचे सांगताना विरदी म्हणाले, “माझे आजोबा, आई आणि आजी यांनी नेहमीच समाजासाठी काम करण्याचे संस्कार दिले. महाराष्ट्राने आपल्याला घडवलं आहे, त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे, हे त्यांनी शिकवलं.”

फाउंडेशनच्या नावाबाबत सुरुवातीला मनात संभ्रम होता. मात्र, “लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय करतोस हे महत्त्वाचं,” असा आईने दिलेला सल्ला आयुष्याला दिशा देणारा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

कॅन्सरग्रस्त मुलांसोबतचे अनुभव सांगताना विरदी भावूक झाले. “त्या मुलांना चित्रपट दाखवण्यासाठी नेणे, त्यांना खाऊ देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे, यातच आयुष्याचं खरं समाधान आहे. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहिला की मी स्वतःला सर्वात श्रीमंत माणूस समजतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. “तुम्ही खरे हिरो आहात,” असे धर्मेंद्र यांनी म्हटलेले शब्द आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

“आनंद देणं हेच खरं जीवन आहे. समाजासाठी काहीतरी केल्याशिवाय खरे समाधान मिळत नाही,” असा संदेश देत विरदी यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारांची परतफेड गरजू आणि निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...
error: Content is protected !!