Homeताज्या बातम्यानंबर प्लेट फिटींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट? – वाजीद खान यांनी RTO...

नंबर प्लेट फिटींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट? – वाजीद खान यांनी RTO पुणेकडे केली तक्रार…

नंबर प्लेट फिटींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट? – वाजीद खान यांनी RTO पुणेकडे केली तक्रार…

 

पुणे :- पुण्यात वाहनांच्या नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी रोजमेर्ता सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या कंपनीला दिलेल्या टेंडरअंतर्गत विविध ठिकाणी डिलर व डिस्ट्रीब्यूटर नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, या डिलर्सकडून नंबर प्लेट फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली वाहनधारकांकडून अवैधपणे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अँटी करप्शन स्क्वॉडचे सर्व भारत अध्यक्ष वाजीद एस. खान यांनी यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे की, दिनांक १२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सहकारनगर येथील “रोजमेर्ता एचएसआरपी फिटमेंट सेंटर” मध्ये त्यांनी स्वतः वाहनाची नवीन नंबर प्लेट बसवली असता, तिथे अतिरिक्त १०० रुपये ‘फिटींग चार्जेस’ म्हणून आकारण्यात आले.

तसेच, जुन्या नंबर प्लेट्सही सेंटरने परत न करता स्वतःकडेच ठेवल्या असून, त्यांचा गैरवापर झाल्यास जबाबदारी कोणाची हे अस्पष्ट आहे.

वाजीद खान यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की

अशा डिलर/डिस्ट्रीब्यूटरवर तातडीने कारवाई करण्यात यावी,

ग्राहकांकडून बेकायदेशीररित्या घेतले जाणारे फिटमेंट चार्जेस त्वरित थांबवण्यात यावेत,

तसेच यासंदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी करून जनतेला माहिती देण्यात यावी.

ग्राहकांच्या फसवणुकीचे हे प्रकार थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

यावर पुणे आरटीओ कडून देखील कारवाई करण्याचे संकेत दिले गेले आहे. तसेच कोणत्याही एजन्सीने अतिरिक्त शुल्क मागितल्यास त्याची तक्रार आरटीओ कडे करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!