Times of Maharashtra Desk:ठाणे शहरातील पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर एका परप्रांतीयाने दारू पिऊन धुडगूस घटणीची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरल्याचा आरोप आहे.हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अपशब्द वापरल्यामुळे मनसेनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे . याची माहिती स्वतः अविनाश जाधव यांनी दिली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे.
“कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव सब मेरे लं… “ ”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” ”इधर कोई भी मराठी आया तो उसकी ….” असे शब्द वापरत रिक्षाचालकणे दारूच्या नशेत धुडगूस घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार गाडी लवण्यावरून हा वाद झाला होता. यावेळी परिसरातील एका परप्रांतीय समूहाने मराठी माणसाला शिवीगाळ करून हुसकावून लावले. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी अभ्रद्र शिविगाळ करत मनसे नेते अविनाश जाधव यांना मारहाण करु असे म्हणाले यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकरतींनी पोलिसात तक्रार करून त्या रिक्षाचालकाला मरण केली आहे. सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या बाबाद अविनाश जाधव यांनी परप्रांतीयनया चांगलीच अद्दल घडवली आहे.
जो कोणी राज ठाकरे यांच्याबाबतीत बोलायची हिंमत करेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही – अविनाश जाधव
या प्रकरणी भाष्य करताना ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे आमच्या मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिलेला आहे. जो कोणी राज ठाकरे यांच्याबाबतीत बोलायची हिंमत करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा दिला आहे. आमच्या नादाला लागू नका, हे भैय्या तम्ही तुमच्या घरी रहा. आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. उरलेल्या भैय्यांना देखील माझी तंबी आहे. आम्ही तुमच्या नादाला लागलो नाही, तुम्ही आमच्या नादाला लागू नका.
ही सर्व बीजेपी कडून सुरू आहे- अविनाश जाधव यांचा आरोप
हे सर्व भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. भाजपाचे जे भाडखाउ नेते आहेत, जे स्टेटमेंट करतात त्यामुळे यांची हिंमत वाढते. भाजपला तेच हवं आहे, या महाराष्ट्रात मुंबई परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांकरिता सहानुभूती मिळावी आणि मत मिळावी. त्यामुळे ही लोक स्टेटमेंट करत असतात, असा आरोप अविनाश जाधव यांनी बीजेपीवर केला आहे.






















