Homeक्राईमकोंढवा येथे ब्रह्मा बिल्डकॉनच्या मिळकतीवर त्रयस्थांचा जबरदस्ती शिरकाव...

कोंढवा येथे ब्रह्मा बिल्डकॉनच्या मिळकतीवर त्रयस्थांचा जबरदस्ती शिरकाव…

त्रयस्थांनी केली मिळकतीवर नुकसान ; त्रयस्थांनी ठेवले होते धारधार हत्यारे…

कोंढवा पुणे : कौसरबाग येथील ब्रह्माकाउंटी जवळील सर्वे क्रमांक 31 या मिळकतीवर काही अज्ञात त्रयस्थांनी अनधिकृतरित्या शिरकाव करून जागा बळकावण्याचा प्रकार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर जागा ब्रह्मा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असून, या मिळकतीसंबंधी सर्व वैध कागदपत्रे, सातबारा आणि अन्य दस्तऐवज कंपनीकडे उपलब्ध असल्याचे ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकीलांनी सांगितले.

प्रकरणाचा तपशील असा की, काही गावगुंडांनी मिळकतीवर जबरदस्तीने ताबा मिळवून तेथे धारदार शस्त्रे, कोयते, चाकू इत्यादी ठेवले. यामुळे जागेवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी केल्याची माहिती वकिलांनी दिली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी मीडियासमोर व्यक्त केली.

मिळकतीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने त्रयस्थांनी जमिनीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर केले नसून उलट तेथील संरचनेचे नुकसान केले आहे. या घटनेमुळे आमच्या पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे वकिलांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीही त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल असे प्रकार घडले होते. त्या कारणाने त्या काळात जागेवर कोणी उपस्थित नसल्याचा फायदा घेऊन हा बेकायदेशीर शिरकाव केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून सदर मिळकतीवरील अनधिकृत कब्जा दूर करण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे.

ह्या प्रकरण बाबतीत पत्रकारांनी पोलीस निरीक्षक गुन्हे जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. आणि त्या ठिकाणाहून निघून गेले.

मुख्य मुद्दे –  ब्रह्मा बिल्डकॉनच्या जागेवर त्रयस्थांचा अनधिकृत कब्जा

त्रयस्थांकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आरोप

जागेवर धारदार शस्त्रे ठेवून धमकीचा प्रकार

सुरक्षा रक्षकाला मारहाण; एफआयआर दाखल

अद्याप पोलिसांकडून कारवाई नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!