Homeउद्योगरेणापूरात अल्पभुधारक शेतकरी व महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात

रेणापूरात अल्पभुधारक शेतकरी व महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात

विष्णू आचार्य (लातूर जिल्हा प्रतिनिधी ) : परिवर्तन संस्था, सुमठाणा आणि जनविकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रेणापूर तालुक्यातील मागासवर्गीय अल्पभुधारक, गायरानधारक शेतकरी तसेच महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात पार पडला. बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ११ वाजता रेणापूर येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष चव्हाण होते. प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य डॉ. तातेराव वाघमारे, नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य, माधव सिरसाट आणि राहुल गंडले यांची उपस्थिती लाभली. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डॉ. तातेराव वाघमारे यांचा अल्पभुधारक व गायरानधारक शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागनाथ चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या जमीनदारांची नक्कल न करता रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि आरोग्यदायी अन्ननिर्मिती होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच महिला बचत गटांनी लघुउद्योग सुरू करून स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. तातेराव वाघमारे, माधव सिरसाट, राहुल गंडले आणि सुभाष चव्हाण यांनीही उपस्थितांना शेतीविषयक नवतंत्रज्ञान, शासकीय योजना, बचत गटांची आर्थिक सक्षमता आणि ग्रामीण विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चिकटे यांनी केले, सूत्रसंचालन विष्णू आचार्य यांनी तर आभार प्रदर्शन डिगांबर चव्हाण यांनी केले.

या मेळाव्यास पानगाव, तत्तापूर, गरसुळी, डिगोळ (दे), आरजखेडा, पोहरेगाव आदी गावांतील शेकडो अल्पभुधारक शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मेळाव्यानंतर गायरान जमिनींचे पंचनामे करून १-ई मध्ये नोंद घ्यावी, सरकारी गायरान जमिनीवर असलेल्या घरांची नोंद करून संबंधितांच्या नावावर जागा करावी आदी मागण्यांचे निवेदन रेणापूरच्या तहसीलदारांना देण्यात आले. या मागण्यांमुळे गायरानधारक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...
error: Content is protected !!