Homeताज्या बातम्यादौंडमध्ये जमीन खरेदी प्रकरणात 3.5 लाखांची फसवणूक, दोन एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल...

दौंडमध्ये जमीन खरेदी प्रकरणात 3.5 लाखांची फसवणूक, दोन एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल…

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) – तालुक्यातील गिरीम येथे जमीन खरेदीच्या नावाखाली 3.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन एजंटांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. पार्वती विश्वनाथ गरूडे (वय 35, रा. शालीमार चौक, दौंड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पवन थोरात व त्यांचे चुलते गोरखनाथ तबाजी थोरात (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी बनावट व्यवहार करून त्यांची फसवणूक केली.

 

14 ऑक्टोबर 2021 रोजी वरील दोघांनी मिळून फिर्यादीकडून दिड गुंठा जमिनीच्या मोबदल्यात 3,50,000 रुपये रोख रक्कम घेतली होती. खरेदीखत क्रमांक 3174/2021 अन्वये सब-रजिस्ट्रार कार्यालय, दौंड येथे नोंदणीही झाली. मात्र, काही दिवसांनी जागेची पाहणी करताना ही जमीन गोविंद भोंगळे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यांनी त्या जागेतील खांब काढून टाकल्याची कबुली दिली.

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆

 

पुन: पुन्हा मागणी करूनही संबंधित एजंटांनी जागेचा ताबा दिला नाही तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर फिर्यादीने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पवन थोरात व गोरखनाथ थोरात यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 420 अन्वये गुन्हा नं. 323/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!