Homeताज्या बातम्यागोळीबार मैदान चौकातील खड्ड्यांवर वानवडी वाहतूक पोलिसांची सामाजिक जबाबदारी

गोळीबार मैदान चौकातील खड्ड्यांवर वानवडी वाहतूक पोलिसांची सामाजिक जबाबदारी

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्यातील कोंढवा भागातून कॅम्पकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गोळीबार मैदान चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सोलापूर बाजार चौकीपासून गोळीबार मैदानापर्यंत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी व अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पीडब्ल्यूडी व महापालिकेच्या कार्यालयांचे अनेकदा धाव घेतली. मात्र, नेमका रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची, याबाबत विभागांमध्ये परस्पर ढकलाढकली सुरू आहे. यामुळे नागरिकांचा त्रास वाढतच चालला होता.

या पार्श्वभूमीवर वानवडी वाहतूक विभागाने स्वतः पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली. वाहतूक पोलिसांनी पेवर ब्लॉक्स टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवले. यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत झाला असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. फुलपगारे पोलीस हवालदार अनिल पवळे, संजीव पाटील, तामाने, महिला पोलीस हवालदार नांगरे तसेच पोलीस शिपाई भोसले, बाळू आल्हाट व चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

शहरातील मूलभूत सोयीसुविधांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी असून वाहतूक पोलिसांनी उचललेले हे पाऊल सामाजिक जाणीवेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....
error: Content is protected !!