Homeताज्या बातम्यापुण्यातील कर्वेनगरमध्ये नळातून आले मैलामिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनावर संताप

पुण्यातील कर्वेनगरमध्ये नळातून आले मैलामिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनावर संताप

Times of Maharashtra Desk : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील गायकवाड चाळ भागात रविवारी (ता. १८) नळाला चक्क मैलामिश्रित पाणी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी कर्वेनगर येथील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळ परिसरात रविवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असता, अनेक घरांमधील नळांना काळसर आणि अत्यंत घाण वास येणारे पाणी आले. हे पाणी इतके दूषित होते की त्यात मैल्याचे अंश स्पष्टपणे दिसून येत होते. पिण्यासाठी आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोगराईचा धोका आणि आंदोलनाचा इशारा दूषित पाण्यामुळे परिसरात जुलाब, उलटी, ताप आणि त्वचारोगासारखे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.”महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन नवीन जलवाहिनी टाकावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

तात्पुरती उपाययोजना आणि दुरुस्ती या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका रेश्मा बराटे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे जार उपलब्ध करून दिले आहेत. महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया याबाबत माहिती देताना पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई म्हणाल्या, “नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही जलवाहिनीची पाहणी केली आहे. या भागात ड्रेनेज लाइनच्या चेंबरमधून काही नळजोड गेले असून, ते जुने झाल्याने गंजले होते. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित नळजोड बंद करण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.”

आज सोमवारी (दि. १९) सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर गळतीची नेमकी जागा शोधून पुढील कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...
error: Content is protected !!