Homeआरोग्यराज्याच्या विकासाला गती: मंत्रिमंडळ बैठकीत सिंचन, आरोग्य, क्रीडा व उद्योग क्षेत्रातील १९...

राज्याच्या विकासाला गती: मंत्रिमंडळ बैठकीत सिंचन, आरोग्य, क्रीडा व उद्योग क्षेत्रातील १९ निर्णय

Times Of Maharashtra Desk : मुंबई जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांनाच भावूक करून गेली. बैठकीच्या सुरुवातीला अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचेमुख्य सचिवांनी शोकप्रस्ताव वाचल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रिमंडळाशी औपचारिक ओळख करून दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही बैठकीला उपस्थिती होती.

या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी तीन निर्णय हे दिवंगत अजित पवार यांच्या अखत्यारित प्रस्तावित आणि महत्त्वाचे असल्याने त्यांना प्राधान्य देत तातडीने मंजुरी देण्यात आली.

त्यामध्ये बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून कटफळ येथे अत्याधुनिक पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग,आर्चरी रेंज आणि बास्केटबॉल मैदान उभारण्यात येणार असून क्रीडा विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार असून सुमारे ८ लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना आणि भूसंपादनासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देणार आहे.

राज्यात माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव अभियान राबवण्यास मंजुरी देण्यात आली असून ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यासह औद्योगिक वसाहती, क्रीडा सुविधा, आरोग्य, शिक्षण, अन्नधान्य वितरण, कर तडजोड, विद्यापीठ कायद्यात सुधारणा अशा विविध क्षेत्रांतील निर्णयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!