Homeउद्योगलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय; निफाड उपबाजाराला स्व. अजित दादा...

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय; निफाड उपबाजाराला स्व. अजित दादा पवार यांचे नाव

निफाड (प्रतिनिधी  उत्तम जाधव) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी निफाड येथील उपबाजार आवार तसेच मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

या बैठकीत उपस्थित सर्व संचालकांनी या प्रस्तावाचे स्वागत करत एकमताने पाठिंबा दर्शविला. परिणामी, लवकरच निफाड येथील उपबाजार आवाराला “लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्व. अजित दादा पवार उपबाजार, निफाड” असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वाराला “स्व. अजित दादा पवार प्रवेशद्वार” असे नाव देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्याची आठवण कायम राहील, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. कृषी व शेतकरी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

लासलगाव बाजार समिती ही देशातील अग्रगण्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एक असून, कांदा बाजारासाठी विशेष ओळखली जाते. त्यामुळे या ठिकाणी घेतलेल्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बाजार समितीच्या या निर्णयामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात या नामांतराची अधिकृत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....
error: Content is protected !!