Homeउद्योग१२९ वर्षांच्या परंपरेला नवी दिशा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; गोदरेज समूहाचा नवा...

१२९ वर्षांच्या परंपरेला नवी दिशा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; गोदरेज समूहाचा नवा प्रवास सुरू

Times Of Maharashtra Desk : मुंबई गोदरेज उद्योग समूह या १२९ वर्षांच्या परंपरा असलेल्या समूहाने आपली नवी ब्रँड ओळख आणि भविष्यातील धोरण जाहीर केले. मुंबईतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत समूहाच्या विविध व्यवसायांना एकत्रित ओळख देण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

समूहाने नवीन ध्येयवाक्य जाहीर करत विश्वास, आनंद आणि धाडस या मूल्यांवर भर दिला आहे. संस्थापक अर्देशीर गोदरेज यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत ही दिशा निश्चित करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. नव्या ओळखीमुळे समूहाच्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ॲग्रीकल्चर आणि केमिकल्स या सर्व व्यवसायांना एकसंध दिशा मिळणार आहे.

आर्थिक कामगिरीच्या बाबतीत, गेल्या पाच वर्षांत समूहाने २० टक्क्यांपेक्षा जास्त चक्रवाढ वार्षिक वाढ नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काळात १५ टक्क्यांपेक्षा जास्त विक्री वाढ आणि २० टक्क्यांपेक्षा जास्त ईपीएस वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक व्यवसायातून १८ टक्क्यांपेक्षा जास्त इक्विटी परतावा मिळवण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांची संख्या तीनवरून पाचपर्यंत वाढवण्याचा मानस असून, पुढील पाच वर्षांत एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ₹५ लाख कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन समूहाने २०३५ पर्यंत नेट-झिरो ऑपरेशन्स आणि २०४५ पर्यंत प्लॅनेट-पॉझिटिव्ह सप्लाय चेनचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. याशिवाय, संस्थेमध्ये महिला, LGBTQ+ समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. परोपकारी उपक्रमांसाठीचा खर्चही वाढवण्याची घोषणा करण्यात आली.

या वेळी पिरोजशा गोद्रेj यांनी वाढ आणि जबाबदारी यांचा समतोल राखण्यावर भर दिला, तर तान्या दुबाश यांनी नवी ब्रँड ओळख ही समूहाच्या भविष्यातील दृष्टीचे प्रतीक असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....
error: Content is protected !!