Homeक्राईमलुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील

उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने गेल्या तीन वर्षांत तब्बल नऊ विवाह करून प्रत्येक वेळेस नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांची लाखोंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. उमापूर येथील एका तरुणाच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. संबंधित तरुणीने त्या तरुणाशी विवाह केला. मात्र हे तिचे पहिले किंवा दुसरे नव्हे, तर नववे लग्न असल्याचे

चौकशीत निष्पन्न झाले. 2023 पासून ती अशा प्रकारे विविध ठिकाणी विवाह करून फसवणूक करत असल्याचे पीडिताने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लक्ष्य करून ही टोळी काम करत होती. टोळीतील एजंट मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधून लग्नासाठी मुलगी उपलब्ध असल्याचे सांगत. त्यानंतर मुलीकडील खर्च, मध्यस्थी

किंवा इतर कारणे सांगून मुलाकडून लाखो रुपये उकळले जात. लग्न झाल्यानंतर काही दिवस नवरी सासरी राहून विश्वास संपादन करायची आणि संधी मिळताच घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन पसार व्हायची. उमापूर येथील पीडित तरुणाकडूनही अशाच पद्धतीने सुमारे तीन लाख रुपयांची उकळपट्टी करण्यात आली. सुरुवातीला साडेतीन लाखांची मागणी करण्यात आली होती; मात्र ती तीन लाखांत ठरली. एक लाख रुपये रोख तर दोन लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे देण्यात आले. उमापूर येथील मंदिरात विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच

नवरीने घरातील रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोने घेऊन पलायन केले. नवरीकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने पीडिताला संशय आला. त्याने चौकशी केल्यानंतर या

तरुणीने यापूर्वीही आठ जणांसोबत विवाह करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणांमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या आंदुरे दाम्पत्याची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्यायाची मागणी केली आहे. या टोळीत गणेश आंदुरे व राधा आंदुरे यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लग्नाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उमापूर येथील तरुणाच्या फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्यांची चौकशी सुरु आहे दोषी आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करु

सचिन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चकलांबा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...
error: Content is protected !!