Homeक्राईमलुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील

उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने गेल्या तीन वर्षांत तब्बल नऊ विवाह करून प्रत्येक वेळेस नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांची लाखोंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. उमापूर येथील एका तरुणाच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. संबंधित तरुणीने त्या तरुणाशी विवाह केला. मात्र हे तिचे पहिले किंवा दुसरे नव्हे, तर नववे लग्न असल्याचे

चौकशीत निष्पन्न झाले. 2023 पासून ती अशा प्रकारे विविध ठिकाणी विवाह करून फसवणूक करत असल्याचे पीडिताने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लक्ष्य करून ही टोळी काम करत होती. टोळीतील एजंट मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधून लग्नासाठी मुलगी उपलब्ध असल्याचे सांगत. त्यानंतर मुलीकडील खर्च, मध्यस्थी

किंवा इतर कारणे सांगून मुलाकडून लाखो रुपये उकळले जात. लग्न झाल्यानंतर काही दिवस नवरी सासरी राहून विश्वास संपादन करायची आणि संधी मिळताच घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन पसार व्हायची. उमापूर येथील पीडित तरुणाकडूनही अशाच पद्धतीने सुमारे तीन लाख रुपयांची उकळपट्टी करण्यात आली. सुरुवातीला साडेतीन लाखांची मागणी करण्यात आली होती; मात्र ती तीन लाखांत ठरली. एक लाख रुपये रोख तर दोन लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे देण्यात आले. उमापूर येथील मंदिरात विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच

नवरीने घरातील रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोने घेऊन पलायन केले. नवरीकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने पीडिताला संशय आला. त्याने चौकशी केल्यानंतर या

तरुणीने यापूर्वीही आठ जणांसोबत विवाह करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणांमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या आंदुरे दाम्पत्याची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्यायाची मागणी केली आहे. या टोळीत गणेश आंदुरे व राधा आंदुरे यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लग्नाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उमापूर येथील तरुणाच्या फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्यांची चौकशी सुरु आहे दोषी आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करु

सचिन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चकलांबा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!