Homeक्राईमलुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील

उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने गेल्या तीन वर्षांत तब्बल नऊ विवाह करून प्रत्येक वेळेस नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांची लाखोंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. उमापूर येथील एका तरुणाच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. संबंधित तरुणीने त्या तरुणाशी विवाह केला. मात्र हे तिचे पहिले किंवा दुसरे नव्हे, तर नववे लग्न असल्याचे

चौकशीत निष्पन्न झाले. 2023 पासून ती अशा प्रकारे विविध ठिकाणी विवाह करून फसवणूक करत असल्याचे पीडिताने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लक्ष्य करून ही टोळी काम करत होती. टोळीतील एजंट मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधून लग्नासाठी मुलगी उपलब्ध असल्याचे सांगत. त्यानंतर मुलीकडील खर्च, मध्यस्थी

किंवा इतर कारणे सांगून मुलाकडून लाखो रुपये उकळले जात. लग्न झाल्यानंतर काही दिवस नवरी सासरी राहून विश्वास संपादन करायची आणि संधी मिळताच घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन पसार व्हायची. उमापूर येथील पीडित तरुणाकडूनही अशाच पद्धतीने सुमारे तीन लाख रुपयांची उकळपट्टी करण्यात आली. सुरुवातीला साडेतीन लाखांची मागणी करण्यात आली होती; मात्र ती तीन लाखांत ठरली. एक लाख रुपये रोख तर दोन लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे देण्यात आले. उमापूर येथील मंदिरात विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच

नवरीने घरातील रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोने घेऊन पलायन केले. नवरीकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने पीडिताला संशय आला. त्याने चौकशी केल्यानंतर या

तरुणीने यापूर्वीही आठ जणांसोबत विवाह करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणांमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या आंदुरे दाम्पत्याची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्यायाची मागणी केली आहे. या टोळीत गणेश आंदुरे व राधा आंदुरे यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लग्नाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उमापूर येथील तरुणाच्या फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्यांची चौकशी सुरु आहे दोषी आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करु

सचिन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चकलांबा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया...

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया...

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...
error: Content is protected !!