Homeआरोग्यगेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, ५ एप्रिल २०२६ रोजी चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमापूर येथून आरोपी विजय महादेव कव्हळे (रा. पळशी, जि. नांदेड) याने दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींना अज्ञात कारणास्तव पळवून नेले होते. या गंभीर घटनेप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६ कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलींच्या अपहरणामुळे हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. तपासाच्या सुरुवातीला आरोपीचे जुने वास्तव्य असलेल्या भिवंडी (जि. ठाणे) येथे पोलिसांनी शोध घेतला, मात्र तिथे आरोपी किंवा मुली मिळून आल्या नाहीत.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तांत्रिक बाबींची मदत घेतली, ज्यातून या मुली बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमाभागात असल्याचे धागेदोरे हाती लागले. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार एक विशेष तपास पथक तात्काळ उत्तर प्रदेशला रवाना झाले. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवपुर दियार आणि त्यानंतर सिकंदरपूर या भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तिथे पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी विजय कव्हळे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर दोन्ही अल्पवयीन मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे आरोपी या मुलींना घेऊन छत्तीसगड राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच चकलांबा पोलिसांनी त्याला जेरबंद करून मोठा अनर्थ टाळला. सलग चार दिवसांचा प्रवास करून तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. ही महत्त्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस कर्मचारी कल्याण पवार, हनुमान इंगोले तसेच तांत्रिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि विकी सुरवसे यांनी बजावली आहे. बीड पोलिसांच्या या तत्परतेमुळे दोन निष्पाप मुलींची सुटका झाल्याने सर्वत्र चकलांबा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...
error: Content is protected !!