Homeआरोग्यगेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, ५ एप्रिल २०२६ रोजी चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमापूर येथून आरोपी विजय महादेव कव्हळे (रा. पळशी, जि. नांदेड) याने दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींना अज्ञात कारणास्तव पळवून नेले होते. या गंभीर घटनेप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६ कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलींच्या अपहरणामुळे हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. तपासाच्या सुरुवातीला आरोपीचे जुने वास्तव्य असलेल्या भिवंडी (जि. ठाणे) येथे पोलिसांनी शोध घेतला, मात्र तिथे आरोपी किंवा मुली मिळून आल्या नाहीत.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तांत्रिक बाबींची मदत घेतली, ज्यातून या मुली बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमाभागात असल्याचे धागेदोरे हाती लागले. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार एक विशेष तपास पथक तात्काळ उत्तर प्रदेशला रवाना झाले. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवपुर दियार आणि त्यानंतर सिकंदरपूर या भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तिथे पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी विजय कव्हळे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर दोन्ही अल्पवयीन मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे आरोपी या मुलींना घेऊन छत्तीसगड राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच चकलांबा पोलिसांनी त्याला जेरबंद करून मोठा अनर्थ टाळला. सलग चार दिवसांचा प्रवास करून तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. ही महत्त्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस कर्मचारी कल्याण पवार, हनुमान इंगोले तसेच तांत्रिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि विकी सुरवसे यांनी बजावली आहे. बीड पोलिसांच्या या तत्परतेमुळे दोन निष्पाप मुलींची सुटका झाल्याने सर्वत्र चकलांबा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!