Homeताज्या बातम्याकंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!'; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बांधकामाच्या बाजूने जनतेला ये-जा करण्यासाठी सुयोग्य पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यातच सद्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे या तात्पुरत्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘खरबी नाक्यावरील’ टोल वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ओबीसी विभाग) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अविनाश राऊत यांनी तहसीलदार व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावर सध्या केसीसी या कंपनीकडून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. शासकीय नियमांनुसार आणि कामाच्या अधिकृत आदेशानुसार कोणत्याही मुख्य रस्त्याचे बांधकाम किंवा दुरुस्ती करताना संबंधित कंत्राटदाराने नागरिकांच्या वाहतुकीसाठी काँग्रेट दर्जेदार व सुरक्षित पर्यायी मार्ग तयार करून देणे बंधनकारक असते. एवढेच नव्हे तर, या पर्यायी रस्त्याच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी मूळ बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद देखील केलेली असते. असे असतानाही, सदर कंत्राटदाराने या सर्व नियमांना केराची टोपली दाखवली असून, अत्यंत निकृष्ट व चिखलमय रस्त्यावरून चालण्यासाठी नागरिकांना भाग पाडले आहे. यामुळे या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, जनतेच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, रस्त्याची पूर्ण वाट लागलेली असताना आणि प्रवास सुरक्षित नसतानाही, या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांकडून ‘खरबी नाक्यावर’ राजरोसपणे व सक्तीने टोल वसूल केला जात आहे. “एकीकडे कंत्राटदार नागरिकांना साधा चालणाऱ्या साठी रस्ता देऊ शकत नाही, तर दुसरीकडे खराब रस्त्यासाठी जनतेकडून टोल वसूल करणे अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहे,” असा संतप्त सूर स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

या अत्यंत गंभीर समस्येची दखल घेत लोकप्रतिनिधी अविनाश आनंदराव राऊत, प्रदिप दोनाडकर, महेश भागकर व इतर नागरिकांनी ब्रम्हपुरीच्या तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून अधिकृत निवेदन सादर केले. प्रशासनाने तात्काळ केसीसी कंपनीच्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजवावी आणि तातडीने तिथे खडीकरण करून रस्ता ये-जा करण्यासाठी काँग्रेट रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत खरबी नाक्यावरील टोल आकारणी थांबवण्याचे आदेश निर्गमित न केल्यास, जनतेच्या सुरक्षिततेसाठी व हक्कांसाठी तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...
error: Content is protected !!