Homeताज्या बातम्यामाळेगाव साखर कारखाना निवडणूक : नाराजांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न; केशवराव जगताप, बाळासाहेब...

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : नाराजांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न; केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे यांच्यावर जबाबदारी…

पुणे/माळेगाव:माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत ‘निळकंठेश्वर पॅनेल’ जाहीर केला असून, या पॅनेलमधून २१ जागांसाठी २१ उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांची नाराजी दिसून येत आहे. ही नाराजी शांत करण्यासाठी अॅड. केशवराव जगताप व माजी आमदार बाळासाहेब तावरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

 

या पॅनेलमध्ये अजित पवार स्वत: उमेदवार असून, संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना करत आहेत. अॅड. केशवराव जगताप म्हणाले, “ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहोत. कोणतीही नाराजी न ठेवता जोमाने प्रचारात सहभागी व्हा. अजितदादांनी निवडलेल्या उमेदवारांमध्येच माझे उमेदवार आहेत, हे समजून सर्वांनी निळकंठेश्वर पॅनेलला विजयी करायचे आहे.”

अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र जागा मर्यादित असल्याने केवळ २१ जणांनाच संधी देण्यात आली. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्या नाराजीचा गैरफायदा विरोधक घेतील, अशी शक्यता लक्षात घेता त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

 

 

Advertisement by Unique ComComputers

👆👆Click the Image 👆👆

अॅड. जगताप पुढे म्हणाले, “अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाईल. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने पॅनेल विजयी करण्यासाठी काम करावे.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी सांगितले की, “माळेगाव कारखाना राज्यातील इतर आघाडीच्या कारखान्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. ऊस दर, साखर उत्पादन, इथेनॉल व वीज निर्मितीतून अधिक महसूल मिळवण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने काम करत आहे. आता एआय (कृत्रीम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.”

पाच वर्षात सभासदांना विक्रमी ऊस दर देण्यात आला असून, ऊस गाळप वेळेत पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा यांसारखी हंगामी पिके घेता आली. कामगारांचे प्रश्न सोडवले गेले आणि वित्तीय संस्थांची देणीही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावेळी निळकंठेश्वर पॅनेलला सभासदांचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...
error: Content is protected !!