गुरुवारी (१२ जून) ‘माझी मातृभूमी प्रतिष्ठान’च्या संपर्क कार्यालयात झालेल्या या भेटीत इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधातील काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे दानवे यांच्या हाती दिली.
जलील यांनी याआधी शेंद्रा एमआयडीसीमधील भूखंड वाटप, व्हिट्स हॉटेल प्रकरण आणि आता शहर व लगतच्या भागातील सरकारी जमिनी व प्लॉट बेकायदेशीरपणे खरेदी केल्याच्या आरोपांनी खळबळ माजवली आहे.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
या प्रकरणातील पुरावे हातात आल्यावर अंबादास दानवे यांनी यावर विधानमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा इशारा दिला असून, राज्यपालांनाही याची माहिती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दोन्ही नेत्यांची ही भेट शिरसाट यांच्या अडचणी वाढवणारी ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.























