Homeताज्या बातम्यामाळेगाव साखर कारखाना निवडणूक : नाराजांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न; केशवराव जगताप, बाळासाहेब...

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : नाराजांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न; केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे यांच्यावर जबाबदारी…

पुणे/माळेगाव:माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत ‘निळकंठेश्वर पॅनेल’ जाहीर केला असून, या पॅनेलमधून २१ जागांसाठी २१ उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांची नाराजी दिसून येत आहे. ही नाराजी शांत करण्यासाठी अॅड. केशवराव जगताप व माजी आमदार बाळासाहेब तावरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

 

या पॅनेलमध्ये अजित पवार स्वत: उमेदवार असून, संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना करत आहेत. अॅड. केशवराव जगताप म्हणाले, “ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहोत. कोणतीही नाराजी न ठेवता जोमाने प्रचारात सहभागी व्हा. अजितदादांनी निवडलेल्या उमेदवारांमध्येच माझे उमेदवार आहेत, हे समजून सर्वांनी निळकंठेश्वर पॅनेलला विजयी करायचे आहे.”

अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र जागा मर्यादित असल्याने केवळ २१ जणांनाच संधी देण्यात आली. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्या नाराजीचा गैरफायदा विरोधक घेतील, अशी शक्यता लक्षात घेता त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

 

 

Advertisement by Unique ComComputers

👆👆Click the Image 👆👆

अॅड. जगताप पुढे म्हणाले, “अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाईल. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने पॅनेल विजयी करण्यासाठी काम करावे.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी सांगितले की, “माळेगाव कारखाना राज्यातील इतर आघाडीच्या कारखान्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. ऊस दर, साखर उत्पादन, इथेनॉल व वीज निर्मितीतून अधिक महसूल मिळवण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने काम करत आहे. आता एआय (कृत्रीम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.”

पाच वर्षात सभासदांना विक्रमी ऊस दर देण्यात आला असून, ऊस गाळप वेळेत पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा यांसारखी हंगामी पिके घेता आली. कामगारांचे प्रश्न सोडवले गेले आणि वित्तीय संस्थांची देणीही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावेळी निळकंठेश्वर पॅनेलला सभासदांचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!