Homeताज्या बातम्यावाहनतळ नसल्याने नोकरदारांचे हाल — रामवाडी व वाघोली मेट्रो स्थानक परिसरातील नागरिकांचा...

वाहनतळ नसल्याने नोकरदारांचे हाल — रामवाडी व वाघोली मेट्रो स्थानक परिसरातील नागरिकांचा संताप…

पुणे: १३ जून: पुणे मेट्रोचा प्रवास सोयीस्कर आणि जलद असला तरी मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळ नसल्याने नोकरदार आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वाघोली, रामवाडी, खराडी, चंदननगर, विमाननगर आणि वडगाव शेरी परिसरातील नागरिकांना या समस्येचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

दररोज कामावर जाण्यासाठी अनेक नोकरदार मेट्रोचा वापर करत आहेत. मात्र स्थानकाजवळ वाहनतळ नसल्यामुळे त्यांना दुचाकी पदपथावर लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस पदपथावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत असून, वाहनधारकांना दरवेळी ७०० ते ८०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी हा दंड भरावा लागतो, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. मेट्रोच्या सोयीमुळे वेळ आणि पैसे वाचतील, या अपेक्षेने नागरिक मेट्रोकडे वळले, मात्र वाहनतळाच्या सुविधेअभावी त्यांना वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

महापालिकेने अद्याप मेट्रो स्थानक परिसरात कोणतीही अधिकृत पार्किंग व्यवस्था केलेली नाही. उलट, ‘नो पार्किंग’चे फलक लावून वाहने हटवण्यात येत आहेत. वाहनतळाची कोणतीही सोय न करता अशाप्रकारे कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

मेट्रो सेवा सुरू करताना स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व मेट्रो स्थानकाजवळ तातडीने अधिकृत वाहनतळाची सोय करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच, जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही, तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई न करता नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेट्रो प्रवाशांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...
error: Content is protected !!