Homeताज्या बातम्यावाहनतळ नसल्याने नोकरदारांचे हाल — रामवाडी व वाघोली मेट्रो स्थानक परिसरातील नागरिकांचा...

वाहनतळ नसल्याने नोकरदारांचे हाल — रामवाडी व वाघोली मेट्रो स्थानक परिसरातील नागरिकांचा संताप…

पुणे: १३ जून: पुणे मेट्रोचा प्रवास सोयीस्कर आणि जलद असला तरी मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळ नसल्याने नोकरदार आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वाघोली, रामवाडी, खराडी, चंदननगर, विमाननगर आणि वडगाव शेरी परिसरातील नागरिकांना या समस्येचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

दररोज कामावर जाण्यासाठी अनेक नोकरदार मेट्रोचा वापर करत आहेत. मात्र स्थानकाजवळ वाहनतळ नसल्यामुळे त्यांना दुचाकी पदपथावर लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस पदपथावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत असून, वाहनधारकांना दरवेळी ७०० ते ८०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी हा दंड भरावा लागतो, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. मेट्रोच्या सोयीमुळे वेळ आणि पैसे वाचतील, या अपेक्षेने नागरिक मेट्रोकडे वळले, मात्र वाहनतळाच्या सुविधेअभावी त्यांना वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

महापालिकेने अद्याप मेट्रो स्थानक परिसरात कोणतीही अधिकृत पार्किंग व्यवस्था केलेली नाही. उलट, ‘नो पार्किंग’चे फलक लावून वाहने हटवण्यात येत आहेत. वाहनतळाची कोणतीही सोय न करता अशाप्रकारे कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

मेट्रो सेवा सुरू करताना स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व मेट्रो स्थानकाजवळ तातडीने अधिकृत वाहनतळाची सोय करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच, जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही, तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई न करता नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेट्रो प्रवाशांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!