Times of Maharashtra Desk: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी एक विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. ते म्हणाले होते की “मतदान करा आणि तुम्हाला निधी मिळेल.”आता त्यांनी त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले गेल्या ३५ वर्षात माझ्यावर अनेक टीका झाल्या पण माझ्यावर कोणाचे ही कर्ज नाही. मी कोणाचाही देणेकरी लागत नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीनचे वारे वाहू लागले आहेत.२ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचार करताना अजित दादा म्हणाले की, मीडिया त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवते आणि कोणताही मुद्दा लगेच उचलून त्यांच्याशी जोडते.
अजित दादांचे विधान काय?
शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती तहसीलमधील मालेगाव नगर पंचायत प्रचारा दरम्यान म्हणाले की जर जनतेने त्यांचे उमेदवार निवडून दिले तर निधीची कमतरता भासणार नाही, परंतु जर त्यांना ‘नाकारले’ गेले तर त्यांनाही ‘नाकारले’ जाईल. अजित पवारांच्या या विधांमुळे त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. विरोधकानी तर हा मुद्दा उचलून धरत आजीत दादांवर आरोप करायला सुरवात केली. या विधानाबद्दल विरोधकांनी त्यांना घेरले आणि माफी मागण्याची मागणी केली.
असंख्य आरोप असूनही, मला माहित आहे की मी कोणाचाही ऋणी नाही.” – उपमुख्यमंत्री अजित पवार
विरोधकांची आरोपची साखळी सुरू असताना अजित पवार यांनी आता विरोधकाना प्रत्युत्तर दिले आहे. “मला आचारसंहिता समजते आणि तिचे उल्लंघन होऊ नये. असंख्य आरोप असूनही, मला माहित आहे की मी कोणाचाही ऋणी नाही.” जिंतूर निवडणुकीपूर्वी त्यांनी परिसरातील विकासाचे आश्वासन दिले आणि म्हणाले, “विकासकामामुळे बाधित झालेल्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल.”तसेच त्यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली की काही गट मतदारांकडून वैयक्तिक माहिती घेत आहेत, त्यामुळे निष्पक्ष कारवाई करावी आणि कायदा सर्वांसाठी समान असावा असे ते म्हणाले.
अजित पवार कधीही भेदभाव करत नाही, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विधानाचे समर्थन केले आणि त्यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले सरकारचे ध्येय सर्व क्षेत्रांचा विकास करणे आहे. जरी त्यांचे सहकारी किंवा इतरांनी असे म्हटले असले तरी तो त्यांचा हेतू नव्हता आणि ते कधीही भेदभाव करणार नाहीत.






















