Homeताज्या बातम्याआणखी एका कुटुंबानं आयुष्य संपवलं; चार जणांनी आयुष्याची दोर कापली; कारण समोर,...

आणखी एका कुटुंबानं आयुष्य संपवलं; चार जणांनी आयुष्याची दोर कापली; कारण समोर, परिसरात खळबळ

तिरुअनंतपुरम: हरयाणाच्या पंचकुलात एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता तशीच घटना केरळमध्ये घडली आहे. केरळच्या वक्कम शहरातील एकाच कुटुंबातील चार जणांनी आयुष्य संपवलं. गळफास घेऊन त्यांनी जीवन प्रवास संपवला. मृतांमध्ये आई, वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. कुटुंब आर्थिक अडचणीत होतं. त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दिली. कुटुंबानं केलेल्या सामूहिक आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

 

अनिल कुमार (५५ वर्षे), त्यांची पत्नी श्रीजा (५० वर्षे) आणि त्यांची मुलं अश्विन (२५ वर्षे), आकाश (२२ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. श्रीजा बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबावर असलेल्या वाढत्या कर्जाचा उल्लेख करायचा, अशी माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संथम्मा एस यांनी दिली. या कुटुंबानं काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून घरासाठी कर्ज घेतलं होतं. यानंतर कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं.

संथम्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये अश्विन एका अपघातात गंभीररित्या जखमी झाला. त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं. तो सहा महिने रुग्णालयात उपचार घेत होता. यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडला. कुटुंबावर कर्ज झालं. शेजाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास कुटुंबाला अखेरचं पाहिलं. मंगळवारी सकाळी १० पर्यंत कुटुंबातील कोणीच बाहेर पडलं नाही. त्यावेळी त्यांच्या घराचं दार उघडं असल्याचं एका शेजाऱ्याच्या लक्षात आलं. शेजारी आत गेला तेव्हा त्याला हॉलमध्ये चार जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

👇👇👇Advertisement 👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆

 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कडक्कावूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ च्या अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

अनिल कुमार वक्कोम सर्व्हिस कोऑपरेटिव्ह बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. तर श्रीजा गृहिणी होत्या. अश्विननं बीकॉम केलं होतं. तो नोकरीच्या शोधात होता. तर आकाश चिरायिनकिजूमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. कुटुंबानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...
error: Content is protected !!