Homeताज्या बातम्यातेलंगणा-महाराष्ट्र सीमावाद उफाळला! 14 गावं कोणाच्या ताब्यात? महाराष्ट्र आक्रमक – रेवंत रेड्डी...

तेलंगणा-महाराष्ट्र सीमावाद उफाळला! 14 गावं कोणाच्या ताब्यात? महाराष्ट्र आक्रमक – रेवंत रेड्डी गप्पच!

 

हैदराबाद | प्रतिनिधी: महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. सीमेलगत असलेल्या १४ गावांचा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र आक्रमक पवित्र्यात दिसतोय, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची संदिग्ध शांतता चर्चेचा विषय ठरतेय.

महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गावांचा प्रशासनिक ताबा महाराष्ट्रात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचं स्पष्ट केलं. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर ठाम भूमिका घेतली आहे.

कुठली आहेत ही वादग्रस्त गावं?

या गावांमध्ये – अंतपूर, पद्मावती, इंदिरानगर, पलासगुडा, येसापूर, भेलापाथर, लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा), शंकरलोढी, महाराजगुडा, कोठा (बीके), परमडोली, मुकदमगुडा आणि लेंडीगुला – यांचा समावेश आहे.

सध्याची परिस्थिती कशी आहे?

या गावांचे नागरिक दोन्ही राज्यांत मतदान करतात, त्यांना दोन्ही राज्यांच्या योजना व सेवांचा लाभ मिळतो. गावात दोन ग्रामपंचायती, दोन शाळा, दोन जलटाक्या आणि दोन निवडून आलेले प्रतिनिधी आहेत! एकाच गावात दोन सत्ताकेंद्रं – ही परिस्थिती आजही सुरू आहे.

महाराष्ट्राने रस्ते, पाणी, शाळा दिल्या, तर तेलंगणा वीजपुरवठा करतो. स्थानिक भाषाही मराठीच, परंतु तेलंगणाचा प्रशासकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे.

गावकऱ्यांची भूमिका काय?

गावकरी तेलंगणामध्येच राहण्यास उत्सुक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी कोमाराम भीम आसिफाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे तेलंगणात कायम ठेवावं, अशी विनंती केल्याचं समजतंय. कल्याणकारी योजना, लाभ आणि सोयी यामुळे नागरिक तेलंगणाकडे झुकत आहेत.

कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही

१९८९ पासून सुरु असलेला हा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. के.के. नायडू आयोगाने पूर्वी यांना आंध्र प्रदेशात सामील करण्याची शिफारस केली होती, परंतु महाराष्ट्राने ती आव्हान दिली आहे. कोणत्याही राज्याच्या सीमेत बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेकडे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.

राजकारण गरम – पण रेवंत रेड्डी शांत!

  • महाराष्ट्राच्या या हालचालींवर तेलंगणातील विरोधकांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणतात की, राज्याचं नेतृत्व ढासळल्यामुळे महाराष्ट्राला संधी मिळतेय. आंध्र प्रदेशासोबतचा पाण्याचा वाद असो की सीमावाद – तेलंगणाचं नेतृत्व गोंधळात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

आता पाहावं लागेल की हा वाद निवळतो की आणखी चिघळतो! १४ गावांची भवितव्य काय असणार? संसद, सर्वोच्च न्यायालय आणि दोन्ही राज्य सरकारांचा पुढील पवित्रा काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...
error: Content is protected !!