Homeआरोग्यअर्जुनी तुकुममध्ये भर दुपारी पाणीपुरवठ्याने संताप; हजारो लिटर पाणी वाया, ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह

अर्जुनी तुकुममध्ये भर दुपारी पाणीपुरवठ्याने संताप; हजारो लिटर पाणी वाया, ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह

आशिष कोटकर ( वरोरा भद्रावती प्रतिनिधी ) :  तालुक्यातील अर्जुनी तुकुम येथील ग्रामपंचायतीचा गलथान कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गावातील बहुतांश नागरिक हे शेतकरी व शेतमजूर असल्यामुळे पिण्याचे पाणी सकाळी लवकर किंवा सायंकाळनंतर सोडणे गरजेचे असताना, ग्रामपंचायतीकडून भर दुपारी पाणीपुरवठा केला जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गावात एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हा पुरवठा नागरिकांच्या उपयोगाचा ठरत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः महिलावर्ग दुपारच्या वेळी शेतात कामासाठी गेलेला असल्याने त्या वेळेत सोडलेले पाणी वाया जात असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई असताना देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

याशिवाय पाण्याच्या टाकीजवळील वाल्वमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याची बाब समोर आली आहे. या गळतीमुळे केवळ पाण्याचा अपव्ययच होत नाही, तर ग्रामपंचायतीवर आर्थिक भारही वाढत असल्याची चर्चा आहे. उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

मंगळवारी भर दुपारी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक व्यवस्थित ठरवून सकाळी किंवा सायंकाळीच पाणी सोडावे, तसेच गळती तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा, येत्या काळात आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...
error: Content is protected !!