Homeआरोग्यजामनेर तालुक्यात अतिवृष्टीची मदत रखडली; पाच महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत, आंदोलनाचा इशारा

जामनेर तालुक्यात अतिवृष्टीची मदत रखडली; पाच महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत, आंदोलनाचा इशारा

 विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) :  जिल्ह्यातील जामनेर तालुका अंतर्गत बेटावद बुद्रुक परिसरातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. 30 ऑक्टोबरच्या रात्रीपासून 1 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः मका पिके पूर्णपणे वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

या नुकसानीनंतर महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. विविध राजकीय नेते व शेतकरी प्रतिनिधींनीही बाधित भागाची पाहणी करत तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रशासनाला त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांची बँक माहितीही अद्ययावत करण्यात आली.

मात्र, पंचनामे पूर्ण होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पीक नुकसानीची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी दाखवण्यात आल्याने विमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

दरम्यान, बेटावद बुद्रुक येथे शेतकरी संघटनेतर्फे सुभाष ठोंबरे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. उपोषणावेळी प्रशासनाने लवकरात लवकर मदत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही.

उत्पादन घटले असून बाजारभावही घसरले आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. शासनाने तात्काळ मदत वितरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!