Homeताज्या बातम्याबांगलादेश दिवाळखोरीच्या धोक्यात: भारताशी संबंध अधिक महत्त्वाचे

बांगलादेश दिवाळखोरीच्या धोक्यात: भारताशी संबंध अधिक महत्त्वाचे

Time of Maharashtra Desk: गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे भारतासह जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. एकेकाळी उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष ओळखीमुळे पाकिस्तानपेक्षा वेगळा ओळखला जाणारा हा मुस्लिम बहुल देश आता वाढत्या अतिरेकीपणा, सामाजिक तणाव आणि अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर राजकीय अस्थिरता, कमकुवत कायदा व सुव्यवस्था, गुंतवणुकीत घट आणि महसुलाचा अभाव यामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. यामुळे जागतिक पातळीवर तानावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कर्जाच्या सापळ्यात बांगलादेश

सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की बंगलादेश जास्तीत जास्त कर्जावर अवलंबून आहे आणि सरकारी खर्च सतत वाढत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, बांगलादेशचे एकूण सार्वजनिक कर्ज गेल्या वर्षी अंदाजे १४ टक्क्यांनी वाढले असून जून २०२५ पर्यंत ते २१ ट्रिलियन टकांहून अधिक झाले आहे, ज्यामध्ये परदेशी आणि देशांतर्गत कर्जाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, बांगलादेशची बाह्य कर्जाची स्थिती मध्यम जोखमीच्या पातळीवर पोहोचली आहे. देशाचे कर्ज-निर्यात प्रमाण अंदाजे १६२ टक्क्यांपर्यंत गेले असून हे सुरक्षित मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे. निर्यातीत आणखी घट झाल्यास देशाला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, अगदी दिवाळखोरीचा धोका देखील आहे,असे म्हंटले जात आहे.

भारताशी संबंधांचे महत्त्व

आर्थिक दबावामुळे बांगलादेशने भारताकडून ५०,००० टन तांदूळ अनुदानित दराने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तांदुळामुळे त्याला इतर देशांपेक्षा कमी किंमतीत आवश्यक अन्नसाठा मिळेल आणि कोट्यवधी रुपये वाचतील. दोन्ही देशांचे दीर्घकालीन व्यापारी संबंध असून भारताने ऐतिहासिकदृष्ट्या बांगलादेशला आर्थिक मदत, कर्जे तसेच रस्ते, पूल व वीज प्रकल्पांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत केली आहे. नवीन अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळ भारत-बांगलादेश संबंधांत तणाव निर्माण झाला असला तरी, सध्याच्या आर्थिक संकटातही या संबंधांचे महत्त्व अधोरेखित होते असे म्हणता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!