Homeताज्या बातम्याकेडीएमसीत भाजप-शिवसेना महायुतीचा दबदबा; 12 उमेदवार बिनविरोध, भाजपची विजयाची हॅट्रिक

केडीएमसीत भाजप-शिवसेना महायुतीचा दबदबा; 12 उमेदवार बिनविरोध, भाजपची विजयाची हॅट्रिक

Times Of Maharashtra Desk : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) जोरदार सुरुवात करत राजकीय आघाडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

सुरुवातीला दोन प्रभागांत भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजपने केडीएमसीत विजयाची हॅट्रिक साधली होती.

गुरुवारपर्यंत भाजपच्या 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी दोन प्रभागांत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

प्रभाग 26 अ मधून मुकुंद पेडणेकर, तर प्रभाग 28 मधून महेश पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग 28 मधून मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 19 (क) मधून भाजप-महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा असून बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी महायुतीचे 12 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने बहुमतासाठी आता केवळ 50 जागांची गरज उरली आहे. त्यामुळे महायुतीने निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

वॉर्ड 18 – रेखा चौधरी

वॉर्ड 26 क – आसावरी नवरे

वॉर्ड 26 ब – रंजना पेणकर

प्रभाग 24 ब – ज्योती पाटील

प्रभाग 27 अ – मंदा पाटील

प्रभाग 26 अ – मुकुंद पेडणेकर

प्रभाग 28 – महेश पाटील

प्रभाग क्र. 19 (क) – साई शिवाजी शेलार

ठाण्यात ठाकरे गटाला धक्का

दरम्यान, ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून जयश्री फाटक या शिंदे गटाच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्या माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी असून, ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने ही बिनविरोध निवड शक्य झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!