Homeमहाराष्ट्रशाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील देलनवाडी येथे घडली. लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथी ‘ब’ चा विद्यार्थी कुमार ईशान सत्यपाल आत्राम याचा दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला होता. आंघोळ आटोपून तो शाळेचा गणवेश परिधान करून तयारी करत असतानाच, सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळला. पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आई-वडिलांनी त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

ईशान हा केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही तितकाच हुशार होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे तो शिक्षक आणि वर्गमित्रांचा अत्यंत लाडका होता. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने शाळेतील शिक्षकांना अश्रू अनावर झाले आहेत. ईशानच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या, २१ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अवघ्या १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या बातमीने पालकांमध्ये मोठी भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका उमलत्या कळीचा असा आकस्मिक अंत झाल्याने देलनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ईशानच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि मोठा आप्तपरिवार असून, संपूर्ण ब्रह्मपुरी शहर आत्राम कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

खाणीत बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

0
मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : नरसाळा येथील पेसा क्षेत्रात बंद पडलेल्या जुन्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेची शक्यता; आमदार-खासदार संख्या वाढणार?

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले...

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

खाणीत बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

0
मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : नरसाळा येथील पेसा क्षेत्रात बंद पडलेल्या जुन्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेची शक्यता; आमदार-खासदार संख्या वाढणार?

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले...

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...
error: Content is protected !!