Homeमहाराष्ट्रसीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पुणे विभागात उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली आहे.

या वर्षी 75 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी यशस्वी ठरले. मराठी विषयात 9 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष कामगिरी केली असून विषयाचा सरासरी निकाल 94.11 टक्के लागला आहे. सामाजिक शास्त्र विषयात श्वेता ढेरे आणि सोहम ढोरमारे यांनी शंभर गुण मिळवून विद्यालयाचा मान उंचावला.

एकूण निकालात साक्षी भागवत पटाईत हिने 97 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर शिवम नागरगोजे (96.60%) द्वितीय आणि श्रेयश दातीर (96%) तृतीय क्रमांकावर राहिले. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत हे महत्त्वाचे घटक ठरले.

विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख रेवननाथ मंचरे, सामाजिक शास्त्र तज्ञ विजयकुमार सोनवणे तसेच रामनाथ वायाळ, अरुण राठी, अस्मिता लांडगे, सागर शेंदगे आणि पुनम फेसरडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्राचार्य विजयकुमार भोसले, उपप्राचार्य एस.पी. वाघमारे, शिक्षकवृंद व पालक समितीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नवोदय विद्यालयाने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...
error: Content is protected !!