Homeताज्या बातम्यानयनता विद्यापीठातील वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार..

नयनता विद्यापीठातील वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार..

27पुणे २७ जानेवारी,२०२५ : नयनता विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आले असून, या वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील. जागतिक दर्जाची संस्था म्हणून नावारुपाला येण्याची या विद्यपीठाची महत्त्वाकांक्षा आहे. या विद्यापीठाला कृष्ण गोपालकृष्णन, नादिर गोदरेज, नौशाद फोर्ब्स, मेहर पुदुमजी आणि सतीश रेड्डी यांसारख्या नामवंत उद्योगपतींचे पाठबळ लाभले आहे.

पुण्यातील बावधन येथे नयनरम्य 6 एकर परिसरात वसलेले नयनता विद्यापीठ पूर्णतः निवासी स्वरूपाचा पदवी अभ्यासक्रम प्रदान करणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना बदल घडवणारा शैक्षणिक अनुभव देईल, असा विश्वास आहे. उद्घाटन सोहळ्यात कृष्ण गोपालकृष्णन यांनी मूल्याधारित संस्थांचे महत्त्व आणि संस्थात्मक संस्कृती मजबूत करण्यामध्ये संस्थापकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

भारतात उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज तातडीची असल्याचे नौशाद फोर्ब्स म्हणाले. नयनता विद्यापीठाच्या भेदभाव न करता, गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रियेतील कटिबद्धतेबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच, देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक विविधतेचे प्रतिबिंब विद्यापीठात दिसेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

नयनता विद्यापीठाने भारतीय उद्योग महासंघाशी भागीदारी केली आहे. यामुळे सैद्धांतिक शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि सांस्कृतिक साक्षरतेचा समतोल साधणारे वेगळेपण असलेले शिक्षण संरचना तयार करण्यात आली आहे.

डॉ. रंजन बॅनर्जी यांनी नयनता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी ठरवलेल्या मूलभूत तत्त्वांची रूपरेषा मांडली. त्यांनी व्यक्तिगत काळजी आणि करिअर विकास या दोन मुख्य गोष्टींवर भर दिला. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्म-जागरूकता वाढवण्यासाठी वैयक्तिक विकास कार्यक्रम राबवला जाणार आहे. याशिवाय, विद्यापीठात अशा प्रकारची संस्कृती विकसित केली जाईल. या ठिकाणी प्राध्यापक आणि संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांच्या लहान गटांशी, तसेच वैयक्तिक पातळीवर संवाद साधतील. तसेच, प्रत्येक शाखेतील प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पाच महिन्यांची आणि एका सत्र कालावधीची इंटर्नशिप समाविष्ट असेल. याशिवाय, तीन एक महिन्यांच्या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट, सामाजिक आणि सरकारी क्षेत्रांचा अनुभव घेता येईल. त्यानंतर, आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाच महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींना प्राधान्य देण्यासाठी नयनता विद्यापीठ विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थी 18 महिन्यांच्या बहुविषयक आधारभूत कार्यक्रमानंतर आपल्या आवडीचे विषय निवडू शकतील. पहिल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, आणि पहिल्या बॅचचे वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील.

या उद्घाटन सोहळ्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, नागरी समाज संघटना, आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नयनता विद्यापीठाच्या उद्दिष्टे आणि दृष्टीकोनाबद्दल सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!